Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथे भले भले गारठले; समुद्रावर अधिराज्य गाजवणारं साम्राज्य; शौर्याचा वारसा मिरवणाऱ्य़ा चोळ घराण्याचा रंजक इतिहास

दक्षिण भारतातील सागरी किनाऱ्यावर चोळ घराण्याचं वर्चस्व होतं त्यामुळे परकिय सत्ता विशेषत: इंग्रज आणि इतर व्यापारी चोळांना घाबरुन असतं. हे चोळ घराणं नेमकं कुठलं आणि त्यांचा नक्की व्यवसाय काय होता ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 05:34 PM
इथे भले भले गारठले; समुद्रावर अधिराज्य गाजवणारं साम्राज्य; शौर्याचा वारसा मिरवणाऱ्य़ा चोळ घराण्याचा रंजक इतिहास
Follow Us
Follow Us:
  • समुद्रावर अधिराज्य गाजवणारं साम्राज्य;
  • शौर्याचा वारसा मिरवणाऱ्य़ा चोळ घराण्याचा रंजक इतिहास
“ज्याची समुद्रावर सत्ता समुद्र त्याचा. ज्याचं आरमार भक्कम त्याचं समुद्रावर वर्चस्व” ही दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती आणि म्हणूनच त्याने स्वराज्यात आरामाराची स्थापना केली. याच कारणासाठी महाराजांना भारतीय नौैदवलाचे जनक म्हणतात. मराठ्यांच्या या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी ही धुरा अगदी जीवात जीव असून यशस्वीरित्या सांभाळली. शिवरायांच्य़ा व्यतिरिक्त देखील असं एक साम्राज्य दक्षिण भारतात घडून गेलं ते घराण म्हणजे चोळ वंशज. दक्षिण भारतातील सागरी किनाऱ्यावर चोळ घराण्याचं वर्चस्व होतं त्यामुळे परकिय सत्ता विशेषत: इंग्रज आणि इतर व्यापारी चोळांना घाबरुन असतं. हे चोळ घराणं नेमकं कुठलं आणि त्यांचा नक्की व्यवसाय काय होता ते जाणून घेऊयात.

हजारो वर्षांपूर्वी या घराण्याने दक्षिण भारतीय साम्राज्याने समुद्रावर राज्य प्रस्थापित केलं. भारताचा दाक्षिणात्य भाग हा समुद्राने वेढलेला. त्यामुळे भौगौलिक वातावरण तसंच असल्याने या चोळ घराण्याचा मूळ व्यवसाय हा जहाजबांधणीचा. चोळ उत्कृष्ट जहाजे तयार करत. चोळ फक्त चांगले व्यापारीच नव्हते तर युद्ध कलेत पारंगत देखील होते. जहाजं बनवणारी अनेक संघटना होती पण चोळांचं मात्र या कामात वैशिष्ट्य होतं.

चोळ जहाजं इतकी शक्तिशाली का होती?
चोळ घराणं लोखंड आणि तांब्याबरोबरच सागवान आणि फणसाच्या लाकडापासून जहाजं बनवत.यामुळे ती जहाजं अतिशय वेगवान, मजबूत आणि लांबच्या प्रवासासाठी पूर्णपणे तयार असत. यांच्या जहाजांपैकी एक म्हणजे ‘थिरिसदाई शिप्स’ ही चोळ नौदलाची वेगळी होत्या. ही जहाजं बलाढ्य असून समुद्रात तरंगणाऱ्या किल्ल्यांसारखी दिसायची

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास काय? ‘या’ जुन्या राजघराण्यांनी मराठी मातीसाठी दिले योगदान

या जहाजांना खास दीर्घकालीन मोहिमांसाठी पाठवलं जात असे, यात सैन्य, घोडे आणि गरजेचा साठा असं सगळं सामावलं जायचं. याचं बरोबर लांबतच्या पल्याच्या प्रवासात किंवा युद्धजन्य परिस्थितीत वेगवान आणि अचानक हल्ल्यासाठी चोळ ‘वज्र शिप्स’ वापरत. या जहाजांची खासियत अशी की, या जहाजांच्या पुढील बाजूस असलेली टोकदार रचना शत्रूची जहाजं फाडून टाकत असे आणि विजय निश्चित करत असे ! खरतर प्रत्येक चोळ जहाज युद्धासाठी बांधले गेले असं नाही. चोळ घराण्याला युद्धकला पारंगत असण्याबरोबरच ते व्यापारात देखील कुशल होते. मसाले, कापड आणि सोन्याच्या व्यापार करत. लांबच्या प्रवासाला जाताना माल वाहून नेण्यासाठी ‘मरक्कलम शिप्स’ वापरली जात.

चोळ इतके लांबचे समुद्री प्रवास कसे करायचे ?

समुद्रकिनारी चोळांचं अख्खं आयुष्य गेलं. त्यांचा सागरी हवामान ताऱ्यांचा व मान्सून वाऱ्यांचा अभ्यास दांडगा होता. या ज्ञानामुळेच ते चीनपासून ते अरब देशांपर्यंतचे मार्ग तयार करू शकले.यापैकी काहीही त्यांच्या गजबजलेल्या बंदर शहरांशिवाय शक्य झाले नसते- नागापट्टिनम, कावेरीपट्टीनम आणि अरिकामेडू सारखी शहरे जागतिक व्यापार केंद्रे बनली होती.

Chattrapati Shivaji Maharaj:”ज्याचं आरमार त्याची सत्ता”; शिवरायांनी स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात ‘या’ किल्याने केली

1025 मध्ये राजा राजेंद्र चोळ याच्या सागरी मोहिमेने संपूर्ण जगाला चकित केलं! या राजाचं सैन्य 5000 किमी दूर इंडोनेशिया व मलेशिया (तेव्हा श्रीविजय साम्राज्य) पर्यंत पोहोचलं. एवढंच नाही तर या साम्राज्याने व्यापारमार्गावर नियंत्रण देखील मिळवलं आणि हिंदी महासागरात वर्चस्व गाजवलं.आपल्या सागरी सामर्थ्याच्या जोरावर चोळांनी जगभर व्यापार वाढवला. कपडे, मसाले आणि सोने निर्यात करुन दक्षिण भारताला नौदलआणि व्यापारी उद्योगात मोठ्या स्तरावर नेलं.अशा प्रकारे चोळांनी फक्त सागरी सत्ताच नव्हे तर व्यापारावर देखील सत्ता निर्माण केली होती.

 

Web Title: The chola empire of south india which dominated the seas and world markets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • India History
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.