Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य! उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता,भारतीय संशोधकांनी केला दावा

भारतासह जगभरात सगळीकडे टीबी आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 04, 2025 | 12:40 PM
सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य! उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य! उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

टीबीसारखा गंभीर आजार होण्याची कारणे?
टीबीच्या आजारांची लक्षणे?
क्षय उपचार पद्धतीत होणार मोठे बदल.

प्रभावी औषधे आणि व्यापक लसीकरण मोहीम असूनही क्षयरोगावर पूर्ण नियंत्रण मिळवणे अजूनही आव्हानात्मक ठरत आहे. उपचार सुरू असताना शरीरात सुप्त अवस्थेत लपून बसणाऱ्या टीबी जीवाणूंमुळे हा आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे. आयआयटी मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात याचे कारण स्पष्ट केले. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने हा अभ्यास महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे संशोधकांचे मत आहे. (फोटो सौजन्य – istock)

20 पैशांची ‘ही’ गोळी हार्ट अटॅकपासून करेल शरीराचा बचाव, थंडगार वातावरणात लहानशी गोळी आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

दरम्यान मअवस्थेतील टीबी जीवाणू त्यांच्या बाह्य पटलात (सेल मेम्ब्रेन) बदल करून स्वतःभोवती एक प्रकारचे संरक्षण कवच तयार करतात. त्यामुळे अँटिबायोटिक्सचा पेशींमध्ये प्रवेश कमी होतो आणि औषधे प्रभावी ठरत नाहीत. हा अभ्यास केमिकल सायन्स या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला. या संशोधनाला भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय आरोग्य संशोधन परिषदेकडून निधी प्राप्त झाला आहे.

औषधांच्या प्रभावावर परिणाम:

रिफाब्युटिन, मॉक्सिफ्लॉक्सॅसिन, अमिकासिन आणि क्लेरिथ्रोमायसिन या टीबीच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची चाचणी करण्यात आली. सुप्त अवस्थेतील जीवाणूंवर परिणाम करण्यासाठी या औषधांचे प्रमाण सक्रिय जीवाणूंच्या तुलनेत दोन ते दहा पट वाढवावे लागले, असे संशोधकांनी सांगितले.

सुप्त अवस्थेतील जीवाणू अँटिबायोटिक्सला का चकवतात ?

टीबीचे जीवाणू शरीरात सुरुवातीला सक्रिय असतात. मात्र काही काळानंतर ते सुप्त अवस्थेत प्रवेश करू शकतात. या अवस्थेत रुग्णाला कोणतीही लक्षणे नसतात आणि आजार पुढे पसरत नाही. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास है जीवाणू पुन्हा सक्रिय होतात, प्राध्यापिका शोभना कपूर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी मायकोबॅक्टेरियम स्मेग्मॅटिस या निरुपद्रवी जीवाणूचा वापर करून हा अभ्यास केला. संशोधनात स्पष्ट झाले की सुप्त अवस्थेत जीवाणूंच्या पेशी पटलातील मेद पदार्थांची रचना बदलते आणि पटल अधिक कठीण व कमी भेद्य होत असल्याचे संशोधन केले.

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग उपाशी पोटी गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, आतड्या होतील स्वच्छ

क्षय उपचार पद्धतीत मोठे बदल शक्य:

सध्याची टीबी उपचार पद्धती सहा महिने किवा त्याहून अधिक काळ चालते. मात्र सुप्त जीवाणूंवर औषधांचा परिणाम कमी होत असल्याने उपचार अपुरे ठरतात आणि प्रतिकारक्षम टीबीची संख्या वाढते. या पाश्र्वभूमीवर संशोधकांनी सध्याच्या औषधांसोबत पेशी पटल शिथिल करणारे विशेष पेप्टाइ देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे अँटिबायोटिक्स पेशींमध्ये अधिक प्रभावीपणे प्रवेश करू शकतील अशी अपेक्षा आहे. सध्या हा अभ्यास प्रयोगशाळेत सुरक्षितरीत्या वापरता येणाऱ्या जीवाणूंवर करण्यात आला असून पुढील टप्प्यात खऱ्या टीबी जीवाणूंवर परीक्षण केले जाणार आहे.

Web Title: The secret of not treating latent caries bacteria major changes in treatment regimens are likely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
1

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
2

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
3

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
4

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.