Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ जादुई पदार्थ, पोट होईल स्वच्छ

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात एरंडेल तेल मिक्स करावे. यामुळे शरीर स्वच्छ होते. जाणून घ्या एरंडेल तेलाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 30, 2025 | 05:30 AM
आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या 'हा' जादुई पदार्थ

आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी कचरा क्षणार्धात पडून जाईल बाहेर! गरम पाण्यात मिक्स करून प्या 'हा' जादुई पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
एरंडेल तेलाचे शरीराचे होणारे फायदे?
आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाय?

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. दिवसभरात खाल्लेले पदार्थ शरीरावर थेट परिणाम करतात. याशिवाय सतत जंक फूडचे सेवन, मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्त वेळ लागतो. कारण शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होत नाही. अन्नपदार्थांचे कण आतड्यांमध्ये तसेच साचून राहतात, ज्यामुळे ऍसिडिटी, अपचन, गॅस आणि पोटाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात, मात्र कालांतराने पोटात जडपणा जाणवणे,. पोटात वेदना, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या 70 व्या वर्षी महिलेने IVF द्वारे दिला बाळाला जन्म, वाढत्या वयात आयव्हीएफ ट्रीटमेंट यशस्वी ठरते का?

वातावरणात होणाऱ्या बदलांचा आणि कमी पाणी पिण्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तासनतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही. आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे काही वेळा आतड्यांचा कॅन्सर किंवा आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेला कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा पदार्थ संपूर्ण शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करतो.

बिघडलेल्या पचनक्रियेमुळे रात्रीच्या वेळी शांत झोप न लागणे, सतत मूड खराब होणे, मानसिक तणाव, पोटात जडपणा इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आयुर्वेदिक उपाय करून आराम मिळवावा. आयुर्वेदिक उपाय शरीरासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेला चिकट मल बाहेर काढून टाकण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन करावे. हे तेल सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास शरीरात जमा झालेली घाण क्षणार्धात बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होईल. पारंपरिक पद्धतीने आतड्यांमध्ये जमा झालेली बाहेर काढून टाकावी.

पचनक्रिया सुधारते:

वारंवार पचनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यास सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मिक्स करून एरंडेल तेल प्यावे. यामुळे पोटात जमा झालेला गॅस बाहेर पडून जाईल आणि शरीर सुधारेल. पोटावर वाढलेला अतिरिक्त तणाव कमी करण्यासाठी आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन करावे.

खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या रक्तपुरवठा बंद झाला आहे? रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन

त्वचेची गुणवत्ता सुधारेल:

आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे आणि बिघडलेल्या पचनक्रियेमुळे काहीवेळा चेहऱ्यावर पिंपल्स, मोठे मोठे फोड येऊन त्वचा खराब होऊन जाते. अशावेळी एरंडेल तेलाचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यासोबतच त्वचा आतून स्वच्छ आणि चमकदार होईल. त्वचेची गुणवत्ता सुधरण्यासाठी एरंडेल तेल फायदेशीर आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?

    Ans: फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खा. उदाहरणार्थ, पेरू, संत्री, ब्रोकोली यांसारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते.

  • Que: पचनक्रिया निरोगी आहे की नाही हे कसे ओळखावे?

    Ans: वारंवार पोटात अस्वस्थता वाटत असेल, अन्न पचत नसेल किंवा वजन बदलत असेल, तर तुमची पचनसंस्था योग्यरित्या काम करत नसावी.

  • Que: ऍसिडिटीची सामान्य लक्षणे?

    Ans: पोटात आणि छातीत जळजळ होणे घशात जळजळ किंवा खवखवणे

Web Title: The toxic waste accumulated in the intestines will fall out in a moment mix it with hot water and drink this magical substance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • Health Care Tips
  • stomach health

संबंधित बातम्या

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
2

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान
3

सफरचंद कधी खावे? चुकीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यास फायदे होण्याऐवजी होईल शरीराचे गंभीर नुकसान

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव
4

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.