पोटात गॅस झाल्यानंतर अस्वस्थता जाणवते? मग 'हे' घरगुती उपाय केल्यास अपचनाच्या समस्येपासून मिळेल सुटका
अपचनवरील घरगुती उपाय?
गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय?
पचनक्रिया सुधारण्यासाठी घरगुती उपाय?
दैनंदिन आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यास पचनक्रिया बिघडते. याशिवाय कामाची धावपळ, कोणत्याही वेळ जेवणे, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. खाण्यापिण्याच्या वेळा चुकल्यानंतर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर ऍसिडिटी, उलट्या, मळमळ आणि पित्त होण्याची जास्त शक्यता असते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अन्ननलिकेमध्ये अन्नाचे बारीक कण तसेच साचून राहतात. ज्यामुळे आंबट ढेकर येणे, घशाजवळ पित्त वाढणे, जळजळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. जेवणानंतर पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण यामुळे फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेला गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यासाठी ओवा आणि काळ्या मिठाचे एकत्र सेवन करावे. यासाठी तव्यावर ओवा हलकासा भाजून घ्यावा. त्यानंतर ओव्याची पावडर करून गरम पाण्यात मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात काळे मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. यामुळे पोटात वाढलेला गॅस कमी होण्यासोबतच शरीरातील घाण बाहेर पडून जाईल. ओव्यांमध्ये असलेले गुणकारी घटक पोटात वाढलेला जडपणा आणि गॅस कमी करण्यास मदत करतात.
आल्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी होतो. यासाठी चमचाभर आल्याच्या रसात मध मिक्स करून प्या. त्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यायल्यास पोटात जमा झालेली सगळी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. पोटात जमा झालेल्या घाणीमुळे डोकेदुखी आणि अपचन होते. यावर उपाय म्हणून आलं खावे. आल्यामध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी आणि पाचक गुणधर्म आढळून येतात.
गॅसवर अतिशय प्रभावी उपाय म्हणजे बडीशेपचे पाणी. जेवणानंतर नियमित बडीशेप चावून खाल्ल्यास अन्नपदार्थ पचन होतात आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो. तसेच बडीशेपचे पाणी प्यायल्यास गॅस कमी होण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लास पाणी टोपात घेऊन उकळवून घ्यावे. त्यानंतर त्यात बडीशेप घालून चांगली उकळी काढून घ्या. उकळी आलेले पाणी गाळून थंड करून सेवन करा.
आळस नव्हे, आरोग्याचा मंत्र! स्मरणशक्तीपासून एकाग्रतेपर्यंत… वामकुक्षीचे वैज्ञानिक फायदे जाणून घ्या
वारंवार तुम्हाला गॅस, अपचनाची समस्या जाणवत असेल तर उपाशी पोटी पुदिन्याची पाने चावून खावीत. पुदिन्याची पाने खाल्ल्यामुळे गॅस, छातीत जळजळ व अपचन कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. पुदिन्याच्या पानांमध्ये असलेला थंडावा शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करतो.
Ans: छातीत किंवा पोटाच्या वरच्या भागात जळजळ होणे, तोंडात आम्लपित्त येणे.
Ans: जास्त मसालेदार, तेलकट, तळलेले आणि फास्ट फूड खाणे.
Ans: एक ग्लास थंड दूध प्यायल्याने जळजळ कमी होते, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे फायदेशीर आहे






