Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसल्समध्ये वारंवार वेदना होतात? शरीरात पाणी कमी झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, बॉडी होईल डिहायड्रेट

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. ही समस्या उद्भवू लागल्यानंतर वारंवार चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2025 | 02:06 PM
शरीरात पाणी कमी झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे

शरीरात पाणी कमी झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे नियमित भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर सुद्धा देतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक किंवा अर्धा ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोट आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ होते. पाण्याचे भरपूर सेवन केल्यामुळे गंभीर आजारांपासून शरीर निरोगी राहते. मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. संपूर्ण शरीराच्या कार्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पाणी कमी झाल्यानंतर सतत चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)

पावसाळ्यात घरबसल्या वाढवा शरीराची Immunity! रोजच्या आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, कोरोना होईल गायब

पाणी कमी झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

लघवीचा रंग बदलणे:

शरीरात पाणी कमी झाल्यानंतर लघवीचा रंग अतिशय गडद होऊन जातो. याशिवाय जळजळ होणे किंवा उन्हाळी लागणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास भरपूर पाणी आणि नारळ पाण्याचे सेवन करावे. याशिवाय लघवीचा रंग बदलू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे.

बद्धकोष्ठता:

शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता पचनक्रिया बिघडण्यामागेच महत्वाचे कारण आहे. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे अपचन, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. सकाळी पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसल्यास नियमित उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे.

डोकेदुखी:

बऱ्याचदा डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण गोळ्या औषधांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम होतात. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर भरपूर पाणी प्यावे. याशिवाय भूक लागल्यानंतर किंवा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोके दुखीची समस्या उद्भवते.

रात्री अचानक लागलेली भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाण्याऐवजी करा ‘या’ पदार्थाचे सेवन, राहाल कायम निरोगी

मसल्समध्ये वेदना:

पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पण शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे हाडांमध्ये वेदना, मसल्स दुखणे किंवा शरीर आखडल्यासारखे वाटू लागते. तसेच शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येणे, त्वचा रुक्ष किंवा कोरडी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These horrible symptoms appear after the loss of water in the body health care tips health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 02:06 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifetyle tips
  • water

संबंधित बातम्या

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत
1

वर्षाच्या बाराही महिने सर्दी होऊन नाकातून पाणी येते? मग आजच आहारातून काढून टाका ‘हे’ पदार्थ, सर्दी वाढण्यास ठरतात कारणीभूत

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे
2

५० वर्षांखालील महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर ओळखणे का आहे कठीण? जाणून घ्या गंभीर आजाराचे निदान उशिरा होण्याची कारणे

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ
3

कलिंगड कापल्यानंतर किती दिवस फ्रेश आणि ताजेतवटवीत राहते? जाणून घ्या कलिंगड खाण्याची योग्य वेळ

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध
4

सतत खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास होतो? हंता व्हायरसने वाढवले संपूर्ण जगाचे टेन्शन,’ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.