Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणातील बदलांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन

शरीराचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.आपले शरीर तंदुरुस्त व रोगमुक्त ठेवण्यासाठी त्या पदार्थांचे आपल्याला मदत होत असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2025 | 05:30 AM
वातावरणातील बदलांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' मसाल्यांचे सेवन

वातावरणातील बदलांमुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' मसाल्यांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रात्रीच्या वेळी तर दिवसभरात वाढलेल्या उन्हामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीराचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वातावरणात बदल झाल्यानंतर काहीवेळा सर्दी, खोकला इत्यादी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)

आतड्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी चपातीच्या पिठात मिक्स करा ‘हा’ गुणकारी पदार्थ, आरोग्यासंबंधित समस्या होतील दूर

दैनंदिन आहारात शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मसाल्यांचे सेवन करावे. आपले शरीर तंदुरुस्त व रोगमुक्त ठेवण्यासाठी त्या पदार्थांचे आपल्याला मदत होत असते. परंतु केवळ माहितीअभावी आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला अनेक पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यातीलच एक म्हणजे किचनमध्ये सहज उपलब्ध होणारे विविध प्रकारचे मसाले घटक. हे पदार्थ अँटीबॅकटेरियल गुणधर्मापासून ते अँटी ऑक्सिडंट, कर्करोगविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण समजले जात असतात. हे सर्व प्रामुख्याने मसाले, औषधी वनस्पती या सर्व गोष्टींचा आपल्या दैनंदिन आहारात समतोल आणि माफक प्रमाणात वापर केला, तर सर्व 60 टक्के आरोग्य समस्या यातूनच दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोणत्या मसाल्यांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत.

तुळस:

तुळस हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऍक्सिडेंट घटक रक्त स्वच्छ करण्याचे काम करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात.याशिवाय तुळशीचा वापर धार्मिक गोष्टींसुद्धा केला जातो. त्यामुळे आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास तुळशीच्या पानांचे सेवन करावे.

दालचिनी:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी किंवा नाश्त्यात दालचिनीच्या चहाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. दालचिनीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी आवश्यक आहेत. धमन्या आणि नरांमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी कार्य दालचिनीच्या माध्यमातून होत असते. तसेच यातून रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.

लवंग:

वातावरणातील विषारी, सुक्ष्मजंतु, जीवाणू आणि बॅक्टेरियापासून शरीराचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त लवंगमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म देखील असतात. लवंगमध्ये असलेले गुणधर्म शरीराचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लवंगचे सेवन करावे किंवा तुम्ही लवंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता.

धणे:

धण्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.धण्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीराची खराब झालेली पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स राहते. रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धण्याचे पाणी प्यावे.

थकवा, अशक्तपणापासून तात्काळ मिळेल सुटका! उन्हाळ्यात नियमित प्या चांदीच्या भांड्यातील पाणी, शरीर राहील कायम निरोगी

जिरे:

सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात जिऱ्याची पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास पचनसंबंधित सर्व समस्या दूर होतील आणि आरोग्याला फायदे होतात. जिऱ्याचे पाणी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे काम करते. यात कॅन्सरविरोधी घटक भरपूर प्रमाणात असतात. दैनंदिन आहारात नियमित जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To improve the bodys immunity which has been weakened due to climate change include these spices in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Healthy life

संबंधित बातम्या

वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात ‘या’ चाचण्या, दीर्घकाळ राहाल हेल्दी
1

वयाच्या तिशीनंतर सुधृढ राहण्यासाठी महिलांनी आवश्यक करायला हव्यात ‘या’ चाचण्या, दीर्घकाळ राहाल हेल्दी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.