
मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर 'या' पद्धतीने घ्या शरीराची काळजी
पावसाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
पावसाळ्यात इन्फेक्शनचा धोका कशामुळे वाढतो?
पावसात भिजून आल्यानंतर अशी घ्या काळजी?
संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. मुसळधार पडणाऱ्या पावसात सगळ्यांचं भिजायला खूप जास्त आवडते. कामावरून येताना किंवा इतर वेळी बाहेर गेल्यानंतर पाऊस पडल्यास भिजायला होतेच. थंडगार पावसात भिजण्याचा मोह अनेकांना अजिबात आवरत नाही. त्यामुळे शरीर पूर्णपणे ओलेचिंब होऊन जाते. पण सतत पडणारा पाऊस आजारपण वाढवतो आणि शरीराला साथीच्या आजारांची लागण होते. संसर्गजन्य आजारांची लागण शरीराला झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन अशक्तपणा, थकवा वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर शरीराची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल माहिती सांगणार आहोत. योग्य काळजी न घेतल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – AI)
Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं
पावसात भिजून आल्यानंतर सगळ्यात आधी अंगावरचे ओले कपडे काढून टाकावेत. ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहिल्यामुळे सर्दी किंवा ताप येऊन थंडी वाजण्याची शक्यता असते. त्यामुळे भिजून आल्यानंतर सगळ्यात आधी अंगावरचे ओले कपडे लगेच काढून टाकावेत. ओल्या कपड्यांमुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊन जाते. तसेच ओलसरपणामुळे त्वचेला बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे कपडे लगेच काढून टाकावे.
पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचून राहण्यास सुरुवात होते. याच पाण्यात घाणीचे विषाणू आणि नाल्यातील पाणी, सांडपाणी इत्यादी प्रकारचे जंतू आणि प्रदूषण असते. हे विषाणू थेट शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याची अंघोळ करणे आवश्यक आहे. अंघोळ करताना पाण्यात मीठ टाकल्यास शरीरावरील जंतू निघून जातात आणि तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. अंघोळ झाल्यानंतर शरीर आणि केस टॉवेलने व्यवस्थित कोरडे करून घ्यावेत.
थंड वातावरणात शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी गरमागरम चहा किंवा काढा प्यावा. गरम पाणी, गवती चहा, आल्याचा चहा किंवा तुळशी-मिरपूड टाकलेला कढा प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि घशाच्या संसर्गापासून बचाव होतो. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत.
Hangover Tips: रात्री दारू पिऊन झालाय हँगओव्हर, करा सोपे उपाय
अनेकदा छत्री असून सुद्धा भिजायला होते.रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्यात जास्त वेळ चालल्यामुळे पायांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे घरी आल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा आणि मॉइश्चरायझर किंवा अँटी-फंगल पावडर लावा. यामुळे पायांवर जमा झालेले विषाणू नष्ट होऊन जातील. ओल्या केसांमुळे डोके दुखणे, सर्दी होणे किंवा टाळूला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे केस व्यवस्थित कोरडे करून घ्यावेत. टॉवेलने किंवा ड्रायरने केस व्यवस्थित वाळवून नंतरच झोपावे.
Ans: ओले कपडे त्वरित बदलावेत, शरीर व्यवस्थित कोरडे करावे आणि शक्य असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
Ans: कोमट पाणी, सूप किंवा इतर गरम पेये घेतल्याने शरीराला उब मिळू शकते आणि आराम वाटू शकतो.
Ans: केवळ पावसात भिजल्याने रोगप्रतिकारशक्ती थेट कमी होत नाही. मात्र थंडी, ओले कपडे आणि संसर्गजन्य जंतूंचा संपर्क यामुळे काही लोकांमध्ये आजारी पडण्याचा धोका वाढू शकतो.