Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोजच्या आहारात करा ‘या’ फळांच्या रसाचे सेवन, शरीर राहील थंड

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित काकडी आणि बीटच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच शरीर सुद्धा थंड आणि निरोगी राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2025 | 08:31 AM
वाढत्या उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' फळांच्या रसाचे सेवन

वाढत्या उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' फळांच्या रसाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उष्णता वाढली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यासह त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेली उष्णता आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीरात थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन, थकवा, अशक्तपणा किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर गेल्यानंतर पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी काकडीचे सॅलड, ३० दिवसांमध्ये होईल वजन कमी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन न करता शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात फळे, भाज्या, सरबत, ताक, दही इत्यादी पदार्थांचे जास्त सेवन करण्यास जास्त प्राधान्य द्यावे. आज आम्ही तुम्हाला वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात कोणत्या फळांच्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही कायम निरोगी राहाल.

बीटचा रस:

रोजच्या आहारात बीटच्या रसाचे नियमित सेवन करावे. बीटमध्ये असलेले गुणधर्म शरीराला आवश्यक पोषण देतात. याशिवाय शरीराचे कार्य सुधारण्यासाठी मदत होते. बीटचा रस नियमित प्यायल्यास शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता दूर होईल आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. बीटचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर बीटचा रस गाळून सरबताचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही बीटच्या रसात लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता.

नसांमधील रक्त होईल साखरमुक्त! मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाजीच्या रसाचे सेवन, कायम राहालं फिट

काकडीचा रस:

सर्वच ऋतूंमध्ये काकडी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. याशिवाय पचनक्रिया सुधारते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे उन्हळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे सेवन करावे. काकडी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. तसेच त्वचेमध्ये जमा झालेले हानिकारक विषाणू बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात काकडीचे नियमित सेवन करावे. काकडीचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडीची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काकडी आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार करून घेतलेले रस गाळून त्यात लिंबाचा रस टाकून सेवन करावे. यामुळे शरीर आतून थंड राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: To protect the body from rising heat consume the juice of these fruits in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी
1

वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी

झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ सोपा नियम, कायमच राहाल शांत
2

झोपण्याच्या किती तास आधी जेवावे? दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘हा’ सोपा नियम, कायमच राहाल शांत

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
3

सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

थंडीच्या कडाक्यात सुकामेव्याला ऊबदार’ मागणी! दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळतोय दिलासा
4

थंडीच्या कडाक्यात सुकामेव्याला ऊबदार’ मागणी! दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळतोय दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.