Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पायांच्या तळव्यांमध्ये खूप जास्त जळजळ आणि आग होते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, वात होईल कमी

पायांमध्ये वाढलेली जळजळ आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि पायांच्या वेदनांपासून सुटका मिळते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2025 | 08:34 AM
पायांच्या तळव्यांमध्ये खूप जास्त जळजळ आणि आग होते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम

पायांच्या तळव्यांमध्ये खूप जास्त जळजळ आणि आग होते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम

Follow Us
Close
Follow Us:

रात्री झोपताना पायांमध्ये जळजळ का होते?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे पाय दुखतात?
पायांमधील वेदना- जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय?

कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वाढत्या धावपळीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर सगळ्यांचं आरामाची आवश्यकता असते. पाय झोपल्यानंतर पायांमध्ये अचानक गोळे येणे, तळव्यांमध्ये वाढलेली जळजळ आग किंवा पायांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी समस्यांमुळे व्यवस्थित झोप होत नाही. झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. याशिवाय चुकीच्या चप्पल वापरल्यामुळे पायांमध्ये खूप जास्त जळजळ आणि वेदना होतात. ही लक्षणे शरीरातील नसा कमकुवत होणे, विटामिन बी १२ किंवा लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात. त्यामुळे पायांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार करून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)

शरीराच्या कोणत्याही अवयवांवर आलेल्या पाणीदार फोड्यांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष! आरोग्यासंबंधित उद्भवेल गंभीर आजारांचा धोका

पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे पायांमध्ये जळजळ:

मानवी शरीरात तीन दोष आढळून येतात. त्यातील कोणताही एक दोष वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्यास सुरुवात होते. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. वाढलेले पित्त शरीराच्या खालच्या भागात साचून राहते. ज्यामुळे उष्णता, जळजळ आणि काहीवेळा पायांमध्ये जळजळ सुद्धा जाणवू लागते. पित्त वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.आहारात अतिमसालेदार पदार्थांचे सेवन करणे, मानसिक तणाव, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायमच थंड आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

जीवनसत्त्वांची कमतरता:

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला पौष्टीक घटकांची आणि आवश्यक विटामिनची खूप जास्त आवश्यकता असते. पण बऱ्याचदा शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. विटामिन बी १२ आणि लोह शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पण या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये खूप जास्त जळजळ आणि वेदना जाणवू लागतात. पायांमध्ये वाढलेला सुन्नपणा आणि जळजळ कमी करण्यासाठी आहारात अंडी, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेवा इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.

हाडे कडकड वाजतायेत? आयुर्वेद बाबांनी सांगितला 10 रुपयांचा उपाय, 206 हाडांमध्ये भरेल मजबूती

पायांमधील जळजळ कमी करण्यासाठी उपाय:

रात्री झोपण्याआधी नियमित पाण्यात बुडवून ठेवावेत. गुलाबपाणी, त्रिफळा किंवा कोरफडीचा रस मिक्स करून तयार केलेल्या पाण्यात पाय ठेवल्यास पायांमधील जळजळ कमी होईल आणि वेदनांपासून आराम मिळेल. तसेच नियमित तुळस, कोरफड आणि शतावरीचे पेय प्यायल्यास शरीरात वाढलेले पित्ताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कोरफड जेल आणि नारळाच्या तेल एकत्र मिक्स करून पायांवर मसाज केल्यास पायांमध्ये वाढलेल्या वेदना आणि जळजळ कमी होईल. कोरफड, गिलॉय, शतावरी, नारळ पाणी आणि टरबूज, कलिंगड इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन थंड कायम राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळव्यांची जळजळ होण्याची मुख्य कारणे?

    Ans: व्हिटॅमिन बी १२ किंवा इतर बी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जळजळ होऊ शकते.

  • Que: पायांमध्ये जळजळ कोणत्या वेळी जाणवते?

    Ans: हा त्रास सहसा रात्रीच्या वेळी वाढतो, ज्यामुळे झोप लागण्यास अडचण येते.

  • Que: या समस्येवर घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: खोबरेल तेल, निलगिरी किंवा पुदिन्याच्या तेलाने पायांची मालिश केल्यास थंडावा मिळतो.

Web Title: Too much burning and burning in the soles of the feet then get permanent relief by doing these home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • ayurvedic tips
  • Health Care Tips
  • vitamin b12
  • Winter Care

संबंधित बातम्या

नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा
1

नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा

हाडे मजबूत ठेवण्यासाठी वयाच्या ३० व्या वर्षानंतर आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी पदार्थांचा समावेश, कायमच राहाल तंदुरुस्त
2

हाडे मजबूत ठेवण्यासाठी वयाच्या ३० व्या वर्षानंतर आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी पदार्थांचा समावेश, कायमच राहाल तंदुरुस्त

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका
3

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तातील साखर राहील नियंत्रणात
4

आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.