
उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय
Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट
लोणावळा
लोणावळा हा मुंबईजवळील सर्वात लोकप्रिय थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे तुम्हाला धरणे, भव्य किल्ले, धबधबे, गुहा, मंदिरे आणि रिसॉर्ट्ससारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येते. इथे तुम्ही प्राचीन मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. यासोबतच इथे तुम्हाला ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो. मुंबईपासून हे ठिकाण ९५ किमी अंतरावर आहे. हे अंतर कापण्यासाठी तुम्हाला २ तासांचा अवधी लागतो. तुम्ही इथे टायगर्स लीप, डेला ॲडव्हेंचर पार्क, बुशी धरण, विसापूर किल्ला या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
माथेरान
माथेरान हे महाराष्ट्रातील दुसरे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबईपासून ११० किमी अंतरावर वसलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी २.५ तासांचा अवधी लागतो. ट्रेकिंगचा आनंद लुटायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते करता येणार आहे. इथले धबधबे आणि हिरवळीचे नैसर्गिक सौंदर्य कुणालाही क्षणात मोहित करुन टाकणारे ठरते. इथे तुम्ही घोड्याची सैर आणि टाॅय ट्रेनच्या सफरीचा आनंद लुटु शकता. यासोबतच दोधनी धबधबा, इर्शालगड किल्ला, चंदेरी लेणी ही इथली काही प्रमुख ठिकाणे आहेत.
पाचगणी
मुंबईपासून २५० किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणांसाठी सुप्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला तलाव, पर्वत आणि घनदाट झाडीचे दृष्य पाहायला मिळेल. यासोबतच तुम्ही इथे पॅराग्लायडिंग आणि गो-कार्टिंगसारख्या साहसी खेळांचाही अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण नौकाविहार, वेण्णा तलाव, पॅराग्लायडिंग, निसर्गदर्शन, टेबल लँड, पाचगणी मेण संग्रहालय यांसाठी लोकप्रिय आहे.
Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या
महाबळेश्वर
महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे ठिकाण कुणाला माहिती नाही. स्ट्रॉबेरी आणि समृद्ध वनस्पती आणि थंड वातावरणासाठी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे. या ठिकाणी पर्यटकांना हिरवीगार डोंगररांग, दऱ्या आणि धबधबे यासोबतच वेण्णा तलाव, सनसेट अँड सनराईज पॉईंट, बाजार, मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी गार्डन, कनॉट पीक, महाबळेश्वर मंदिर अशा अनेक लोकप्रिय ठिकाणांना भेट देता येते. मुंबईपासून २७५ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण समर वेकेशनसाठी एक परफेक्ट चाॅईस ठरते. मुंबईहून इथे जायला जवळपास ५ तासांचा वेळ लागतो.