
देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली
फ्लाइटमध्ये आता ‘सोफा कम्फर्ट’! नवीन सीट डिझाइनने प्रवास होणार अधिक आरामदायी
लहान मुलांना दत्तक घेता येते हे तर आपण ऐकले आहे पण भगवत्तांना दत्तक घेण्याची गोष्ट सर्वांनाच थक्क करणारी आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे जैन समाजात एक हृदयस्पर्शी परंपरा आहे. येथे भक्त देवाचे पालक होण्यासाठी प्रार्थना करतात. हे विचित्र वाटू शकते पण खांडवा येथील जैन समाज गेल्या ४५ वर्षांपासून ही परंपरा जपत आहे. जैन समाजात ही एक अत्यंत पवित्र दुर्मिळ संधी मानली जाते ज्यासाठी लोक वर्षानुवर्षे तपश्चर्या आणि त्याग करतात.
दगडापासून देवत्वापर्यंतचा पवित्र प्रवास
वास्तविक पाहता, खांडवा येथील ४५ वर्षे जुन्या महावीर दिगंबर जैन मंदिरात भव्य पाच दिवसीय पंच कल्याणक उत्सव आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम मुनिश्र आदित्य सागर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली घासपुरा परिसरात आयोजित केला जाईल. पंच कल्याणक उत्सव हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे ज्यात देवतेच्या पाषाणमूर्तीची प्रतिष्ठापना करत तिची मनोभावनेने पूजा केली जाते.
जेव्हा भक्त दैवी शक्तीचे पालक बनतात
या सोहळ्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे भक्तांना देवमाता होण्याचा बहुमान मिळतो. यासाठी समाजातील सदस्य चिठ्ठी टाकून आणि बोली लावून निवड प्रक्रियेत भाग घेतात. बरेच जण या संधासाठी आपली इच्छा आगाऊ व्यक्त करतात, परंतु अंतिम निर्णय गुरु आणि समाजाच्या परंपरेनुसार घेतला जातो. जैन समाजात देवमाता होण एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. याला आध्यात्मिक साधनेचे प्रतिक मानले जाते. कुणालाही याचा मान मिळत नाही तर त्यासाठी व्यक्तीला अनेक त्याग करावे लागतात, तसेच आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल देखील घडवून आणावे लागतात. यानंतरच तो व्यक्ती या मानासाठी पात्र मानला जातो.
इंद्र दरबार आणि श्रद्धेची आज्ञा
जैन समाजात पंचकल्याण दरम्यान, भगवंताच्या पाच प्रमुख शुभ घटनांचे चित्रण करणारे पाच दिवस पाच विशेष धार्मिक विधी आयोजित केले जातात. या दिवसांंमध्ये इंद्राचा दरबार उभारला जातो, ज्यात इंद्र आणि इंद्राणी बनण्याची संधी दिली जाते. लोक यात आवडीने सहभागी होतात आणि कधीकधी या मानासाठी बोली देखील लावली जाते. ही बोली बऱ्याचदा लाखो रुपयांपर्यंतही पोहचू शकते.
लांब ट्रिपसाठी कपल्स घेत आहेत ‘ सीट डिव्होर्स’, लोकांना का आवडत आहे हा अनोखा ट्रेंड?
देवाचे पालक होण्यासाठी भाविकांची रांग
मिळालेल्या वृत्तानुसार, काही लोक या कार्यक्रमातील सेवांसाठी लाखो रुपयांची बोली लावतात, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिकच भव्य बनतो. तथापि, समाजातील सदस्यांचे म्हणणे आहे की, जैनांना समान वागणूक दिली जात असली तरी, ही परंपरा श्रद्धा आणि भक्तीने ओतप्रोत असून ती अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. यात सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लोक स्वत:ला भाग्यशाली मानतात. भाविकांद्वारे पूर्ण श्रद्धेने आणि मनाने यात सहभाग घेतला जातो. देवाचे पालक होण्याची संधी मिळावी म्हणून दूरदूरवरुन लोक या ठिकाणी देऊन भक्तीभावाने सोहळ्यात संमेलित होतात.