
लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो 'या' आजारांचा धोका
लघवीला उग्र वास कोणत्या आजारांमुळे येतो?
उन्हाळ्यात लघवी इन्फेक्शन होण्याची कारणे?
लघवी इन्फेक्शन झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरसंबंधित असंख्य समस्या वाढू लागतात. अनेकांना उन्हाळा ऋतूला अजिबात आवडत नाही. कारण या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे खूप जास्त थकवा, अशक्तपणा यासोबतच इतरही आजार होण्याची शक्यता असते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे केवळ थकवाच नाहीतर लघवीचा रंग बदलणे, लघवी करताना खूप जास्त जळजळ होणे, लघवीला दुर्गंधी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार लघवीसंबंधित समस्या उद्भवत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. लघवीला येणार उग्र वास ही केवळ सामान्य समस्या नसून शरीरसंबंधित या गंभीर आजारांचा धोका आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
महिलांनो लक्षात ठेवा! पीरियड्सवेळीचूकुनही ‘या’ फळांचे सेवन करू नये, अन्यथा वाढू शकते मोठी समस्या
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन वाढते आणि खूप जास्त थकवा, डोकेदुखी, त्वचा निस्तेज होणे, तोंड कोरडे पडणे यांसारख्या समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात लघवीला वास येण्याचे प्रमुख कारण म्हणजे डिहायड्रेशन. त्यामुळे नियमित ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक घामावाटे बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. शरीराला आवश्यक पाणी न मिळाल्यामुळे लघवी जास्त ‘कॉन्सन्ट्रेटेड’ होते आणि लघवीला वास येऊ लागतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा फार आवश्यक आहे. उष्णता आणि स्वच्छतेच्या अभावामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग वाढतो आणि लघवीला उग्र वास येण्यास सुरुवात होते. यासोबतच लघवी करताना खूप जास्त जळजळ किंवा वारंवार लघवीला जावे लागते. मूत्रमार्गात वाढलेल्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
दैनंदिन आहारात सगळ्यां कायमच तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त आवड असते. पण नेहमीच तिखट तेलकट पदार्थ शरीरासाठी योग्य नसतात. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. कांदा, लसूण किंवा विशिष्ट औषधांच्या सेवनामुळे लघवीमध्ये इन्फेक्शन वाढून लघवीला उग्र वास येऊ लागतो. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आहारात कमीत कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे.
Ans: लघवीला उग्र वास येण्यामागे डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), युरिन इन्फेक्शन, काही अन्नपदार्थ किंवा औषधे कारणीभूत असू शकतात.
Ans: उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि शरीरात पाण्याची कमतरता होते, त्यामुळे लघवी अधिक कॉन्सन्ट्रेटेड होते आणि वास तीव्र होतो.
Ans: भरपूर पाणी प्या, स्वच्छता राखा, कॅफिन आणि मसालेदार पदार्थ कमी करा आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.