पावसाळ्यात किडनीवर ताण का वाढतो? मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स, आरोग्य तज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला
पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी?
पावसाळ्यात किडनीच्या आजारांचा धोका का वाढतो?
किडनी स्वच्छ राहावी म्हणून उपाय?
पावसाळा उष्णतेपासून दिलासा देणारा असला तरी या ऋतूमध्ये संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) धोका वाढतो. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य खबरदारी घेतल्यास पावसाळ्यातही मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखता येते. याबद्दल डॉ. ज्योती बनसोडे, नेफ्रॉलॉजिस्ट व किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ, न्यूईरा हॉस्पिटल्स, वाशी, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
Food Divorce म्हणजे नेमकं काय? आवडत्या पदार्थांपासून दूर जाण्याचा वाढत आहे अनोखा ट्रेंड
पावसाळा हा आल्हाददायक वातावरण घेऊन येतो, मात्र त्याचबरोबर संसर्गजन्य आजार, दूषित अन्न-पाणी आणि हंगामी आजारांचाही धोका वाढतो. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार (सीकेडी), डायलिसिस सुरू असलेले रुग्ण, किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण किंवा वारंवार किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमित तपासण्या, योग्य उपचार आणि आवश्यक ती खबरदारी घेतल्याने पावसाळ्यात मूत्रपिंडांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येते.
मूत्रपिंडाच्या आजारामुळे अनेक रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय), निर्जलीकरण, पोटाचे संसर्ग, लेप्टोस्पायरोसिस तसेच विविध विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. हे संसर्ग मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण निर्माण करतात.
याशिवाय, किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांना मूत्रमार्गाचा संसर्ग, न्यूमोनिया, इन्फ्लूएंझासारखे श्वसनाचे विषाणूजन्य आजार आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. उकळून थंड केलेल किंवा शुद्ध पाणी प्या. अस्वच्छ ठिकाणचे अन्न आणि उघड्यावरील (स्ट्रीट फूड) पदार्थ खाणे टाळा. शक्यतो ताजे, घरगुती आणि संतुलित आहाराचे सेवन करा.
डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्या त्यात खंड पडू देऊ नका.डायलिसिस सुरू असलेल्या रुग्णांनी मुसळधार पाऊस किंवा इतर कारणांमुळे डायलिसिस चुकवू नका. मूतखडा असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेसे पाणी प्यावे, तर दीर्घकालीन मूत्रपिंडाचा विकार असलेल्या रुग्णांनी द्रवपदार्थांचे प्रमाण आणि आहारासंबंधी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
ताप, लघवी करताना वेदना किंवा जळजळ, पाय किंवा चेहऱ्यावर सूज, लघवीचे प्रमाण कमी होणे, उलट्या किंवा जुलाब यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्वमर्जीने औषधोपचार करणे टाळा. विशेषतः ताप किंवा अंगदुखीसाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नका, कारण काही औषधांमुळे मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
चिखल किंवा साचलेल्या पाण्यात अनवाणी चालणे टाळावे. यामुळे लेप्टोस्पायरोसिस आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होतो. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही काळजी विशेष महत्त्वाची आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इन्फ्लूएंझा आणि न्यूमोकोकल लसी वेळेवर घेणे फायदेशीर ठरते. विशेषतः दीर्घकालीन मूत्रपिंड विकार असलेले आणि किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण यांनी या लसीकरणाबाबत जागरूक राहावे.
पावसाळ्यात योग्य आहार, स्वच्छता, नियमित औषधे, वेळेवर तपासण्या आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केल्यास मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहून स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
Ans: पावसाळ्यात तापमान आणि आर्द्रतेतील बदल, पाणी कमी पिण्याची सवय, संसर्गाचा वाढलेला धोका आणि बदललेला आहार यामुळे काही व्यक्तींमध्ये किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Ans: शरीराला पुरेसे पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. मात्र पाण्याची गरज व्यक्तीनुसार बदलते.
Ans: पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) झाल्यास त्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास संसर्ग किडनीपर्यंत पोहोचू शकतो.






