
चेहऱ्यावर कायमच टिकून राहील तारुण्य! संत्र्याच्या सालींपासून घरीच तयार करा आयुर्वेदिक साबण, त्वचा होईल उजळदार
शरीर स्वच्छ करण्यासाठी अंघोळ करताना संपूर्ण शरीराला साबण किंवा बॉडी वॉश लावले जाते. यामुळे अंगावर चिकटलेली घाण आणि धूळ माती स्वच्छ होऊन जाते. पण शरीरावरील सर्वच अवयवांना साबण लावणे योग्य नाही. साबणात असलेले हानिकारक केमिकल युक्त घटक त्वचेचे गंभीर नुकसान करतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे साबण उपलब्ध आहेत. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी किंवा त्वचेवर आलेले पुरळ कमी करण्यासाठी महिला कोणत्या ना कोणत्या साबणाचा वापर करतात. साबणात असलेले केमिकल घटक त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निस्तेज करून टाकतात. तसेच शरीरातील प्रत्येक व्यक्ती एकाच साबणाचा वापर अंघोळ करण्यासाठी करत असेल तर त्वचेला इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
शरीराची काळजी घेण्यासाठी कायमच केमिकलयुक्त साबणाचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेल्या साबणाचा वापर करावा. घरगुती पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचा कायमच सुंदर आणि ग्लोइंग ठेवतात. आज आम्ही तुम्हाला संत्रीच्या सालींचा वापर करून साबण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी संत्र्याची साल अतिशय प्रभावी ठरेल. संत्र्याच्या सालीमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करतात.
संत्र्याच्या सालीचा साबण बनवण्यासाठी संत्र्याची साल, साबणाचा बेस, आणि सिलिकॉन मोल्ड एवढेच साहित्य लागणार आहे. साबण तयार करण्यासाठी सर्वप्रथम, संत्र सोलून त्याच्यावरील साल काढून घ्या. दोन ते तीन संत्र्याच्या साली मिक्सरच्या भांड्यात टाकून तयार आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. साबणाच्या बेसचे लहान लहान तुकडे करा. त्यानंतर डबल बॉयलर साबणाचे तुकडे पूर्णपणे वितळवून घ्या. त्यानंतर त्यात संत्र्याच्या सालीचे मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर सिलिकॉन मोल्डमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून अर्धा तास तसेच ठेवा.
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम
अर्ध्या तासानंतर साबण तयार होईल. सुगंधित, नैसर्गिक आणि घरगुती संत्र्याच्या सालींचा वापर करून बनवलेला साबण त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरेल. संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे त्वचा उजळदार होईल. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅन कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालींपासून बनवलेल्या साबणाचा नियमित वापर करावा. घरगुती पदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा वापर केल्यास त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. त्वचा कायमच मुलायम आणि चमकदार राहील.