मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टेम्पोच्या अपघातात 12 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय जे जखमी आहेत, त्यांच्यावर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
पंतप्रधान कार्यालयाचं ट्विट
समद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात अनेकांनी जीव गमावला. या घटनेने मनाला अतिव दु:ख झालं. ज्यांनी आपल्या जवळची माणसं गमावली त्या कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रर्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पीएम केअर फंडमधून 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
Pained by the loss of lives due to an accident in Chhatrapati Sambhajinagar district. My thoughts are with those who lost their loved ones. I wish the injured a speedy recovery. An ex-grata of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured…
— PMO India (@PMOIndia) October 15, 2023