Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढीव रक्कमेची घोषणा हवेत; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार ऐवजी दोनचं हजार

एकीकडे शेतकरी संकटात आहे. राज्यातील काही भागात पाऊस अधिकचा झाला तर काही भागात अल्प झाला. ज्या भागात अल्प पाऊस झाला तेथे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी अडकला आहे तर जेथे अधिकचा पाऊस झाला तेथे ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीत आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2023 | 10:51 AM
वाढीव रक्कमेची घोषणा हवेत; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार ऐवजी दोनचं हजार
Follow Us
Close
Follow Us:

आटपाडी : केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना लागू केली. या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टप्या- टप्याने जमा केले जात होते. याच धर्तीवर राज्य शासनानेही १२ हजार रुपयांची वाढ करून २४ हजार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची घोषणा केली. मात्र राज्य सरकारने यात बदल केला आणि ही योजना उशीराने अंमलात येणार असल्याचे सांगितले. यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची वारंवार चेष्टाच केली जात आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

केंद्र शासनाकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा होवू लागले. वर्षाला सहा हप्यात १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील तिन वर्षापासून जमा होण्यास सुरुवात झाली. राज्यातील सरकार बदलल्यानंतर शिंदे सरकारने शेतकऱ्यांनाही राज्य सरकार केंद्र सरकारप्रमाणे मदत करेल, अशी घोषणा केली. तर ही मदत या १४ व्या हप्यापासून दिली जाणार असल्याचे जाहीर केले.

एकीकडे शेतकरी संकटात आहे. राज्यातील काही भागात पाऊस अधिकचा झाला तर काही भागात अल्प झाला. ज्या भागात अल्प पाऊस झाला तेथे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी अडकला आहे तर जेथे अधिकचा पाऊस झाला तेथे ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाची ही योजना शेतकऱ्यांना तारणार असल्याचे अनेक शेतकरी बोलून दाखवत होते. मात्र राज्य शासनाने यामध्ये यु टर्न घेत ही योजना सध्या लागू झाली नाही. मंत्री मंडळाचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातील, अशी भुमिका घेतली. यामुळे शेतकरी वर्गात राज्य शासनाच्या विरोधात सध्या चिड निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन

शेतकरी एकीकडे खुश झाला होता कारण आता २ हजाराऐवजी ४ हजार रुपये मिळणार या आनंदात शेतकरी वर्ग होता आणि हा हप्ता कधी जमा होईल याची वाट प्रत्येक शेतकरी लाभार्थी पाहत होता. दि. २८ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचे २ हजार रुपये जमा झाले. मात्र या सोबत राज्य सरकारचे २ हजार रुपये जमा न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राजकीय नेत्यांचे फाेटाेसेशेन

मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने अनेकांच्या शेतीतील पिकांची वाढ थांबली आहे. मक्यावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यातच शासनाकडून कोणतीही मदत किंवा घोषणाही अद्याप झालेली नाही. अजून प्रशासनाकडून पंचनामेही केले जात नाहीत. केवळ राजकीय नेते मंडळी बांधावर येवून फोटो काढून निघून जात आहेत. मदत कधी देणार अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार

एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अगोदरच सरकारच्या धोरणा विरोधात तिव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि अशातच शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी न करता राज्य सरकारने दोन हजार रुपयांची घोषणा केली. ही घोषणा हवेतच विरगळली काय? केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार घोषणा करत आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार राज्य सरकार करत असल्याची तिव्र भावना शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: A declaration of increased amount is required 2 000 instead of 4 000 on account of farmers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2023 | 10:51 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • DCM Devendra Fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ
2

BMC Election 2026: पदयात्रा आणि घरोघरी प्रचारामुळे राजकारण्यांची भूक वाढली! समोसे, वडापाव आणि बिर्याणीच्या मागणीत २५% वाढ

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
3

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे
4

Nagpur Municipal Election 2026 : नागपूर महापालिका निवडणुकीत ४४७ मतदान केंद्रे संवेदनशील; गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक केंद्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.