Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीस एकर ऊसाला अचानक आग; शेतकऱ्यांच मोठं नुकसान

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 10, 2022 | 05:29 PM
तीस एकर ऊसाला अचानक आग; शेतकऱ्यांच मोठं नुकसान
Follow Us
Follow Us:

भुदरगड : भुदरगड तालुक्यातील निळपण येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर पूर्वेस व वेदगंगा नदीपासुन वरील बाजुच्या जवळपास पंचवीस ते तीस एकर क्षेत्रात अचानक लागलेल्या आगीमुळे संपुर्ण क्षेत्रातील असलेले ऊसाचे पिक जळुन खाक झाले आहे.

निळपण गावापासून खालच्या बाजूस वेदगंगा नदी व दुधगंगा उजवा कालवा यामुळे सर्वत्र ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही आग पसरली असती तर गावातील लोकवस्तीत व घरापर्यंत गेली असती, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. प्रसंगावधान राखून गावातील तरूणांनी व ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्यात आले, अन्यथा गावाजवळील शकडो एकराहून अधिक क्षेत्र जळुन खाक झाले असते व प्रचंड प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले असते. यामुळे निळपण येथील जवळपास वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

दरम्यान शुक्रवारी अचानक अकराच्या सुमारास आग लागली होती. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे संपुर्ण शेतीचे क्षेत्र हे एकमेकाला लागुन असल्याने ही आग सर्वत्र पसरल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यास कठीण झाले, त्यामुळे संपुर्ण ऊस जळुन खाक झाला. या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. यामध्ये शहाजी जोतिराम ढेरे, धनाजी जोतिराम ढेरे, दत्तात्रय विष्णु मेंगाणे, धनाजी विठ्ठल देसाई, महादेव आप्पासो मेंगाणे, बाबुराव दादु देसाई, संतोष शंकरराव देवणे, संभाजी शंकर गुरव, साताप्पा अर्जुन मेंगाणे, यशवंत नागु निलवर्ण, सर्जेराव नागु निलवर्ण, अशोक नारायण निलवर्ण, बाळासो बापु चौगुले, जीवन जयसिंग चौगुले, शिवाजी तुकाराम देसाई, किरण रन्ताकर कुलकर्णी, सर्जेराव केरबा मेंगाणे, परशुराम केरबा मेंगाणे, मोहन सखाराम मेंगाणे अशा वीस ते पंचवीस शेतकर्‍यांचा ऊस आगीत जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बिद्री साखर कारखाना संचालक मधुआप्पा देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपुस केली. शेतकऱ्यांचा ऊस ताबाडतोड कारखान्याला घालण्याचे आश्वासन दिले.

Web Title: A sudden fire of thirty acres of sugarcane farmers are the biggest losers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 05:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • kolhapur
  • maharashtra
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
1

गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
2

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
3

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी
4

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.