Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडले’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 13, 2023 | 08:53 PM
‘…तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडले’; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. ‘ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ते निघून गेले. ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले’, असे त्यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींवर टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ते निघून गेले. ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले. ज्यांना आम्ही कुटुंबातील मानायचो, परिवारातील मानायचो. त्यांच्यावर इतका विश्वास टाकला तरीही ते लोक निघून गेले. 20 मे रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना घरी बोलावले होते. त्यांना सर्व गोष्टी विचारण्यासाठी घरी बोलावलं होतं.

तसेच जे काही नऊ महिन्यांपूर्वी घडलं त्यानंतर आम्हाला विचार करायला वेळ मिळाला नाही. याबाबत एकटा असताना विचार करतो तेव्हा वाईट वाटतं. ज्या माणसाने तुम्हाला सगळं दिलं त्याच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता. पक्ष सोडणं वेगळी गोष्ट आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पक्ष नुसता सोडला नाही तर चोरला

अनेक लोक पक्ष सोडतात, पण यांनी पक्ष नुसता सोडला नाही तर पक्ष चोरला. नाव चोरणं, चिन्ह चोरणं, जे काही आम्ही त्यांच्यासाठी केलं. ते विसरून आम्हाला शिव्याशाप देणं हे कितपत योग्य आहे? माणुसकीवरचा विश्वास उडवणारी ही गोष्ट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारण्याआधी ते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते. तेव्हा त्यांनी आपल्याला जेलमध्ये टाकलं जाईल या भीतीने ते रडले होते, असा मोठा गौप्यस्फोटही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Web Title: Aaditya thackeray criticized on eknath shinde and shinde group nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2023 | 06:21 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Cm Eknath Shinde
  • devendra fadnavis
  • Dy CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप
1

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन
2

राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करा; साताऱ्यात विरोधी पक्षांचे ‘राम रक्षा’ आंदोलन

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
3

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य
4

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.