श्रीगोंदा : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून पाच आरोपी पसार होत असल्याबाबतची माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना समजताच त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना माहिती दिली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने श्रीगोंदा रेल्वे स्टेशनला धाव घेऊन ठीक चार वाजता निजामबाद ते पुणे डेमो एक्सप्रेस या गाडीची तपासणी केली असता, खूनातील पाच आरोपींना रेल्वेमधून श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरली या गावातील मन्मथ ईरवंत धोंडापुरे (वय २८ वर्ष) यांचे गावातील काही तरुणांचे किरकोळ भांडण झाले होते. या प्रकरणात गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पाटील चव्हाण यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यातील प्रमुख आरोपी बालाजी ढगे, मन्मथ यांना जीवे मारण्याची धमकी देत होता. (दि २६) ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मन्मथ यास आरोपी बालाजी ढगे, बंटी ढगे, कृष्णा ढगे, गोविंद ढगे, सचिन खंडगावे, या पाचही जणांनी लाकडी दांडक्याने, कोयता, तसेच धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर प्रहार करून ठार मारले. आणि बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात फेकून दिले. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते रेल्वेने पसार झाले. या घटनेची माहिती संदीप मस्के श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना माहिती समजतात आरोपी हे पुण्याकडे जाऊ शकतात अशी माहिती समजताचं त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना माहिती दिली.
जानकर व पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी विलंब न लावता पंधरा पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन श्रीगोंदा रेल्वे स्टेशन तात्काळ गाठले. त्याक्षणी पुण्याकडे जाणारी निजामबाद एक्सप्रेस येताचं जानकर व अभंग यांनी दोन तीन पोलिसांचे पथक तयार करून सर्व रेल्वे डब्यांची तपासणी केली असता, खून करणारे पाचही आरोपी मिळून आले. व तसे आरोपींनी आम्हीचं खून केला आहे अशी कबुली दिली.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे स पो नि महेश जानकर, पोसई समीर अभंग, स फो विठ्ठल बडे, पो कॉ. मुकेशकुमार बडे, भरत खारतोडे, संभाजी गर्जे , दादासाहेब टाके, किरण बोराडे, विनायक जाधव, योगेश सुपेकर, राजु भोर, संभाजी घोडे, दादाराम म्हस्के यांनी कामगिरी केली.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी खून करून पाच आरोपी रेल्वेने पुण्याकडे पळून जात असलाची माहिती समजतात अगदी काही मिनिटातच श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला व नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्ष यांनी श्रीगोंदा पोलिसांचे कौतुक केले.
मयत मन्मथ ईरवंत धोंडापुरे हा आमच्या भागातील मोठा गुंड होता, त्याचे वडील देशी विदेशी दारू विक्री करतात. त्यामुळे आमच्या भागात त्याची दहशत होती. आम्हा सर्वांना त्याने एकएकाला गाठून मारहाण केली आहे. या गुंडाला आम्ही कायमचा संपवला याचा आम्हाला आनंद आहे. आत्ता आम्ही पोलिसांना शरण जाणार आहे, असे पाचही आरोपींनी सांगितले.