फोटो सौजन्य: Gemini
Kia Seltos चे 2 नवीन मॉडेल्स लवकरच लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या अपेक्षित किंमत
लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे शेतकरी सोमनाथ जिजाबापू गाडगे यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी उशीरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे यांनी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात कांद्याची लागवड केली होती. दिवसभर त्यांच्या शेतात महिला मजुरांकडून कांदा काढणीचे काम सुरू होते.
सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. त्या पाठोपाठ जोरदार पावसाला आणि वादळाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी महिला मजूर प्लास्टिकच्या आडोशाला थांबल्या होत्या. मात्र, काही अंतरावर उभ्या असलेल्या सोमनाथ गाडगे यांच्यावर अचानक वीज कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसर दणाणून गेला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याच दिवशी रात्री उशीरा पाथरे बुद्रुक येथे आणखी एक भीषण घटना घडली. अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेची तार तुटून थेट गायींच्या गोठ्यावर कोसळली. या दुर्घटनेत तब्बल नऊ गार्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संजय भास्कर घोलप आणि सोपान लक्ष्मण घोलप यांच्या गोठ्यात घडली.
“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान
लोणी येथे शेतात उभे असलेले गाडगे यांच्या अंगावर विजेच्या तडाख्यामुळे आगीचे लोळ पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या महिला मजुरांचा थरकाप उडाला. या घटनेमुळे लोणी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमनाथ गाडगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि आई असा परिवार आहे.
लोणी येथे वीज पडून एकाचा मृत्यू, त्या पाठोपाठ रात्री पाथरे येथे नऊ गायींचा अंत, या दोन्ही घटना अवकाळी पावसामुळे घडलेल्या आहेत. एकीकडे या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असतानाच दुसरीकडे जिवीत हानी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरण व महसूल प्रशासनाचे अधिकारी पाथरे येथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी गायींच्या गोठ्याकडे धाव घेतली. मदत मिळेपर्यंत गायींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत शेतकरी संजय घोलप यांचे अंदाजे नऊ लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.






