
मुंबईकरांच्या जीवनात 'एआय वैद्य'ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांकडे गेल्यानंतर ‘काय त्रास आहे?’, ‘किती दिवसांपासून आहे?’, ‘आधी काही आजार आहेत का?’ अशा प्रश्नांमध्ये जाणारा वेळ आता मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘वैद्य एआय’ प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, रुग्णाची प्राथमिक वैद्यकीय माहिती डॉक्टरांपर्यंत आधीच डिजिटल स्वरूपात पोहोचणार आहे. त्यामुळे उपचार प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(फोटो सौजन्य – AI)
महापालिका आणि फॅक्टल ॲनॅलिटिक्स लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही प्रणाली केईएम, राजावाडी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कांदिवली) रुग्णालय तसेच काही महापालिका दवाखान्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात वापरली जाणार आहे. महापालिकेचे प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले की, वैद्य एआय डॉक्टरांची जागा घेणार नाही, तर त्यांचा स्मार्ट सहाय्यक म्हणून काम करेल.
रुग्णाची लक्षणे, वैद्यकीय इतिहास आणि प्राथमिक माहिती डॉक्टरांकडे आधीच उपलब्ध असल्याने हिस्ट्री घेण्यात जाणारा वेळ कमी होईल. त्यामुळे डॉक्टरांना निदान आणि उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा संशय असल्यास कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत, याचाही अंदाज डॉक्टरांना तत्काळ घेता येईल. एचएमआयएस आणि व्हॉट्सऍप चॅटबॉटशी ही प्रणाली जोडली जाणार असल्याने रुग्णसेवेबरोबरच आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमताही वाढणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
७८ वैद्य एआय डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाही, तर डॉक्टरांना अधिक अचूक प्राथमिक माहिती आधीच डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याने डॉक्टरांचा वेळ वाचेल आणि ते उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील, यामुळे रुग्णांचा प्रतीक्षाकाळ कमी होऊन महापालिकेच्या आरोग्य सेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता दोन्ही वाढतील, असे मत डॉ. शैलेश मोहिते, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये यांनी व्यक्त केले आहे.
Sanjay Raut News: अयोध्येचा अंडरवर्ल्ड चालवणारा ‘दाऊद’ कोण…? संजय राऊतांचा गंभीर आरोप
एखाद्या रुग्णाने ॲपमध्ये ताप, खोकला, अंगदुखी किंवा वजन कमी होणे अशी लक्षणे नोंदवली.
तर प्रणाली त्यानुसार प्राथमिक विश्लेषण करून जवळचा महापालिका दवाखाना किंवा आवश्यक असल्यास थेट रुग्णालयात जाण्याचा सल्ला देईल.
गंभीर आजाराचा संशय असल्यास त्याचीही सूचना मिळेल.