
Ajit Pawar plane crash Preliminary report reveals 2 reasons for accident
लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानातील इंधनामुळे तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. दुसऱ्या दिवशी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा : ‘…तर आंबेगाव तालुक्यात एमआयडीसी उभारणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
अपघातानंतर घटनास्थळाहून अजित पवार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांच्या हातातील घड्याळामधून अजित पवारांच्या पार्थिवाची ओळख पटली. विमान अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सीआयडीचीही स्थापना या प्रकरणात करण्यात आली. विमान अपघातानंतर लगेचच केंद्रिय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित तपास केला. हेच नाही तर अपघातानंतर विमानाचे राहिलेले अवशेष देखील मुंबईला तपासासाठी आणण्यात आली.
प्राथमिक दोन कारणं आली समोर
बारामती विमान अपघातानंतर डीजीसीएने चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या प्राथमिक अहवालात मोठी माहिती पुढे आली. मीडिया रिपोर्टनुसार, या प्राथमिक अहवालामध्ये वैमानिकाचा अंदाज चुकला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वैमानिकाचा अंदाज चुकला किंवा विमानात तांत्रिक बिघाड हे देखील कारण दिसत आहे. कारण धावपट्टीच्या अगदी जवळ हे विमान कोसळले. वैमानिकांचा अंदाज चुकल्याची मोठी शक्यता आहे. कारण ज्यादिवशी हा अपघात झाला, त्यादिवशी व्हिजिबिलीटी कमी असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. अजून याबाबत सखोल तपास केला जात आहे. हे प्राथमिक दोन कारणं असल्याचे अहवालात म्हटले.
हे देखील वाचा : पुणे महापालिकेत ढिसाळ, नियमबाह्य कारभार ? शहर काँग्रेसचा गंभीर आरोप
बदलली राजकारणाची दिशा
अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलली आहे. अजित पवारांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीचा एक गट सत्तेमध्ये कायम राहिला आहे. तर दुसरा गट हा विरोधामध्ये राहिला आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हे पक्षाचे अध्यक्ष होण्याची शक्यता होती. मात्र अद्याप नाव समोर आलेले नाही.