Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 20, 2026 | 06:36 PM
१२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

१२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : राज्याचा शेवटचा टोक असलेल्या तसेच विदर्भातील आदिवासीबहूल, औद्योगिकविरहित सिंचनाची फारशी सुविधा नसलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. जिल्ह्यातील शेती नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहेत. अशातही काही शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधेच्या आधार बहूपीक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र यासाठी नियमित व सुरळित वीजपुरवठा होणे आवश्यक आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत. पूर्व विदर्भास गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान, भाजीपाला, मक्का व अन्य रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा

खरीप हंगामात झालेला तोटा रब्बी हंगामात भरून काढू असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र महावितरण कंपनीच्या भारनियमनाचे आसूड शेतकऱ्यांच्या मानेवर कायम आल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. आठ तास वीजपुरवठा होत असताना आरमोरी विधानसमा क्षेत्रातील लोकप्रतिनिधीने ऊर्जामंत्र्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर १२ तास वीजपुरवठा होणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांची घोषणा हवेतच विरली. पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात धान भाजीपाला, मका तसेच आता उसाची पण मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील शेवटचा टोक म्हणून गडचिरोली जिल्ह्याकडे बघितले जाते. याठिकाणी औद्योगिक क्षेत्र नाही तरीही शेतकऱ्यांसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा केला जातो. सोबतच कृषिपंपासाठी कमी दाब असलेला पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात पूर्णपणे सिंचन करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता रब्बी हंगामातील धान शेतीस भेगा पडल्या आहेत. धान पिके करपून गेली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून बारमाही शेती करण्याचे स्वप्न रंगविले. मात्र महावितरण कंपनीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

महावितरणचा भोंगळ कारभार; शेतकरी हवालदिल

महावितरण कंपनीद्वारे वीजपुरवठा केवळ आठ तासासाठी दिला जात आहे. यातही वारंवार वीजपुरवठा खंडित केला जातो. अनेकदा कमी दाबाचा पुरवठा केला जातो. महावितरणच्या गलथान कारभाराशी लढा देत असताना शेतकऱ्यास वन्यप्राण्यांचा धोका बाळगून शेती करावी लागत असते. शेतकऱ्यांना मदतीची गरज असतांना लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचा आरोप केला जात आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र शेतकऱ्यास किमान १२ तास वीजपुरवठयाची गरज असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने विकासाचा संकल्प कोणत्या कामाचा असा प्रश्न शेतकऱ्याकडून केला जात आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव ठरतोय डोकेदुखी

एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी शेतात राबराबून मोठ्या हिमतीने उत्पादन घेत आला आहे. मात्र दुसरीकडे ऐन बहरावर आलेले पीक वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त केले जात असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून हत्तीच्या कळपांनी पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने सतराशे-साठ विघ्न घालित असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

Web Title: A 12 hour power supply announcement is just in the air there is a need for measures crops are destroyed and farmers suffer financial losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • amravati
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.