
102 टक्के पाऊस; तरीही 'या' जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट
Amravati News Marathi : अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे सुमारे १०२ टक्के पर्जन्यमान झाले. मात्र वाढते तापमान, भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि विहिरी-हातपंप आटण्याच्या स्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात ५४५ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुमारे १९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार करून विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील १४ पैकी १० तालुक्यात सरासरीइतका तर उर्वरित ४ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जवळपास एकूण १०२ टक्के पर्जन्यमान झाले आहे.
असे असतानाही यंदाच्या उन्हाळयात ५४५ संभाव्य पाणीटंचाईची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील ५६ प्रकल्पात ५१.९४ टक्के जलसाठा आहे. यामध्ये अपर वर्धामध्ये ५३.३५ मध्यम प्रकल्पात ४८.५१ आणि लघुप्रकल्पांत ४२.३५ इतका जलसाठा आजघडीला उपलब्ध असला तरी भूजल पातळीत घसरण, विहीर व हातपंप आटण्याची स्थिती आणि वाढते तापमान यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर मात्र करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०२६ च्या उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ सुमारे १९ कोटी ०७लाख ५७ हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७२२ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. प्राथमिक सर्वेक्षणानुसार प्रामुख्याने मेळघाट व पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये नळदुरुस्ती १४३ गावात विहीर अधिग्रहण अशा प्रकारच्या विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.
जिल्ह्यात अपर वर्धा प्रकल्पात आजघडीला ७३.३४ टक्के, तर मध्यम प्रकल्पात ४८.५१ टक्के आणि लघुप्रकल्पांत ७२.३५ टक्के जलसाठा आहे. यंदा पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या आराखड्यात ५४५ गावांत पाणीटंचाईचा अंदाज घेऊन आराखडा व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदा पाणीटंचाई निवारणार्थ सुमारे १९ कोटी ७लाख ५५ हजार रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. यामध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.
संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणीटंचाई निवारणार्थ १४३ खाजगी विहिरी अधिग्रहण व १५ टँकरचे नियोजन केले आहे. एका गावात टैंकर तर दोन गावांत विहीर अधिग्रहण जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची झळ फारशी जाणवत नसली तरी पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या चिखलदरा तालुक्यातील मोथा येथे ३ टँकरने तर मोर्शी तालुक्यातील २ गावात खाजगी विहीर अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासन निर्णयानुसार टंचाई आराखडयात संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ विविध प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत.
जिल्हा परिषदेने पाठविलेल्या टंचाई आराखड्याला जिल्हाधिका-यांकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार टप्याटप्याने टंचाईची कामे करण्यात येणार आहेत. सध्या एका गावात टँकरने तर दोन गावांत खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता
पाणीपुरवठा विभाग स्नेहा धावडे यांनी दिली.
वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. काही प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणी उपलब्ध असले तरी शेवटच्या टोकावरील गावांपर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्च्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने उपाययोजना होत आहेत.
नळयोजना विशेष दुरुस्ती – २८६
नवीन विधन विहीर – 97
तात्पुरती पूरक नळयोजना – 04
सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण – 51
खासगी विहीर अधिग्रहण – १४३
स्त्रोत बळकटीकरण उपाययोजना – १२६
टँकरने पाणीपुरवठा करणे – 15
अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प