अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था ठप्प
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढून २ लाख १७ हजार ४२९ रुपयांपर्यंत पोहोचले असले, तरी वाढती महागाई आणि मर्यादित रोजगार संधींमुळे या वाढीचा सर्वसामान्यांच्या जीवनमानावर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीनुसार, शेतीवर असलेले मोठे अवलंबित्व आणि उद्योगांचा अभाव ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने ठरत आहेत. राज्याच्या सांख्यिकी विभागाने नुकताच आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला असून, अमरावती जिल्ह्यासाठी ही आकडेवारी संमिश्र चित्र दर्शवणारी ठरली आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न २१७४२९ रुपये इतके नोंदवले गेले असले, तरी प्रत्यक्षात ही वाढ सर्वसामान्यांच्या जीवनमानाला अपेक्षित असा आधार देताना दिसत नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्नात फारशी लक्षणीय वाढ झालेली नाही. २०११-१२ च्या तुलनेत दररोज केवळ २३७ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.(फोटो सौजन्य – AI)
पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडणार! अमरावतीमध्ये वसुली कमी, खर्च अधिक; भवितव्यावर काळे ढग
वाढती महागाई आणि उत्पन्नवाढीची ही संथ गती लक्षात घेता, ‘जगावे कसे?’ हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. जिल्ह्याच्या एकूण विकासदरात (जीडीपी) कृषी क्षेत्राचा वाटा आजही मोठा असला, तरी उद्योगांच्या अभावामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित राहिल्या आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत आकडे मोठे भासत असले, तरी रुपयाचे घसरलेले मूल्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे या वाढीचा प्रत्यक्ष फायदा कमी झाल्याचे वास्तव आहे. तथापि, विविध व शासकीय योजनांचा सकारात्मक परिणाम यामुळे यंदा जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात ते वाढ झाल्याचे मानले जात आहे.
टॅक्स कलेक्शनमध्ये अकोला अव्वल; खामगाव दुसऱ्या स्थानावर तर अमरावती विभाग…
अमरावतीकरांचे दरडोई उत्पन्न २१७, ४२९ रुपये १० वर्षातील वाढ केवळ ८६ हजार रुपये आहे. जिल्ह्याचा जीडीपी ७० हजार २७ कोटी रुपये आहे. तर यात कृषी क्षेत्राचा वाटा १६६६५ कोटी आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. सततची अतिवृष्टी आणि नापिकीचा फटका शेतीच्या उत्पन्नाला बसत आहे. जिल्ह्यात पंचतारांकित एमआयडीसी असूनही मोठे प्रकल्प न आल्याने रोजगारातून मिळणारे उत्पन्न स्थिर राहिले आहे. उच्चशिक्षित तरुणांचे पुण्या-मुंबईकडे होणारे स्थलांतर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला खीळ घालत आहे.






