
( फोटो सौजन्य : AI )
दिवसा ढवळ्या सुरू असलेल्या या धाडसी रेती चोरीमुळे नदीचा नैसर्गिक समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या रेती उपशामुळे परिसरातील भूजल पातळी झपाट्याने खाली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोकलेनच्या वापरावर बंदी असतानाही रेती उपसा नदीपात्रातून रेती उपसा करताना पोकलेन व इतर जड मशिनरीचा वापर करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरीदेखील काही ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे पोकलेनच्या सहाय्याने रेती काढली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून महसूल विभाग व पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, रात्रीसह दिवसा देखील
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. त्यात ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जात आहे. या प्रकारामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महसूल प्रशासन व संबंधित विभागाच्या नाक्यावर तपासणी सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र वाळू माफियांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान, गेल्या सलग २ वर्षांपासून रेती घाटांचे लिलाव रखडले होते. यावर्षी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेती व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावून घाटांचे कंत्राट घेतले. मात्र कंत्राट मिळताच काही ठिकाणी खनिकर्म विभागाच्या नियमावलीला पायदळी तुडवत पोकलॅण्ड मशीनच्या साहाय्याने सीमांकन क्षेत्राबाहेर तसेच सीमांकन क्षेत्रातही खोलवर उत्खनन सुरू केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत स्थानिकांमध्ये बरीच नाराजी व्यक्त केली जात आहे.