आठ गावांची 'जीवनरेषा' धूसर! कोट्यवधी रुपये पाण्यात; मेळघाटातील बारातांडा-धूळघाट रस्ता खड्यात गडप
मेळघाटातील बारातांडा ते धुळघाट (रेल्वे) या सुमारे १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. हा रस्ता आठ गावांसाठी ‘जीवनरेषा’ ठरेल आणि थेट धारणी मुख्यालयाशी जोडेल, असे सांगितले गेले होते. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता कंत्राटदारांचे नशीब उजळविण्याचे साधन ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच अर्धवट झाले होते. जे काही बांधकाम करण्यात आले होते तेही अवघ्या सहा महिन्यांत उखडू लागले. दीड वर्षाच्या आत डांबरीकरण पूर्णपणे नाहीसे झाल्याने सध्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी हा रस्ता आहे की, खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.(फोटो सौजन्य – istock)
Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका
या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाबाबत सर्वात गंभीर बाब म्हणजे रस्त्याच्या कामाची माहिती देणारे फलकही लावण्यात आले नाहीत. हे काम नेमके कोणत्या विभागाने केले, किती खर्च झाला आणि कंत्राटदार कोण आहे, याबाबतची माहिती जनतेपासून दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.दरम्यान, या मार्गावरून दररोज शाळकरी मुले, रुग्ण आणि शेतकरी धारणी येथे ये जा करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधा आणि पैसे कमवा’ अशीच पद्धत अवलंबली जात असल्याचा संतापही मेळघाटवासीयांनी व्यक्त केला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार की पुढील पावसाळ्यात संपूर्ण रस्ता इतिहासजमा होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासन खड्डे भरून रस्ता दुरुस्त करणार की जनतेचा रोष वाढू देणार? याकडे मेळघाटवासीयांचे लक्ष लागले आहे.
आपत्कालीन कोटववधी रुपये परिस्थितीत खर्चुन बांधलेला गर्भवती महिलांना सहा धारणी महिनेही येथे टिकला पाठवले नाही. जाते. पावसाळ्यात मात्र मोठ्या या खड्यामुळे गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी. जिजाबाई रामेश्वर कासदेकर, सरपंच, घुळघाट यांनी आपले ,मत व्यक्त केले आहे .
बारातांडा ते घुळघाट (रेल्वे) हा रस्ता अर्धवट असून, जे बाधले गेले तेही काही दिवसांत उखडून गेले. हा मार्ग धारणी मुख्यालयाशी ओडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. निकृष्ट कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करून रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. या रस्त्याबाबत माहिती संबंधित उपअभियंत्यांना कळविण्यात येईल. त्यानतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ग्रामस्थांचे मत आहे.






