मुंबई – अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज शुक्रवारी दाखल केला. यावेळी ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील शुक्रवारी उमेदवार अर्ज दाखल केला. आज सकाळी राज ठाकरेंनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं पत्र फडणवीसांनी लिहिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद (Sharad pawar) पवार यांनी देखील अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं भाजपाला आवाहन केलं आहे.
[read_also content=”नागपूरमध्ये रस्ता की ‘रस्त्यांची रांगोळी’…खड्डयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची शिंदे-फडणवीसांवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/ncp-criticizes-to-shinde-fadnavis-about-nagpur-pit-336775.html”]
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अंधरी पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. योग्य संदेश जपण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, याची आठवण सुद्धा पवारांनी करुन दिली. ऋतुजा लटके ह्या ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत, त्यांना बिनविरोध निवडून द्यावं. निवडणूक बिनविरोध केल्यास महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल, असं पवार म्हणाले. निवडणूक प्रतिष्ठेची करु नये, अर्ज मागे घेण्याची मुदत अजून आहे, त्यामुळं मी आवाहन करतो की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी. दरम्यान, पालिकेनं राजीनाम्यावर योग्य निर्णय घ्यायला पाहिजे होता. दीड वर्षाच्या कालावधीसाठी राजकारण नको. रमेश लटकेंचं योगदान पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन शरद पवारांनी भाजपाला केलं आहे, त्यामुळं भाजपाकडून याला काय उत्तर येतंय हे बघावे लागेल.