सौजन्य - नवराष्ट्र टीम
बुलढाणा : आषाढ महिना लागला की, विठ्ठल भक्तांची पावले पंढरीच्या दर्शनासाठी वळू लागतात. दरवर्षी जिल्ह्यातील भाविकांच्या सोयीसाठी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसचे आयोजन करण्यात येते. आज दुपारी पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. तर दुसरी फेरी 17 जुलै रोजी खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
यंदा 18 बोगींच्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसमध्ये जनरल बोगी 7 ,आरक्षित बोगी 7, वातानुकीत बोगी 2 , गार्डसाठी 2 बोगी यामध्ये प्रवासी व दिव्यांगांना बसण्याची व्यवस्था केली तर एकूण 1 हजार 311 भाविकांना घेऊन ही विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस रवाना झाली असून, पहिल्या फेरीमध्ये एकूण सात लाख 5 हजार 415 रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.
यावेळी रेल्वे प्रशसनाकडून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचे स्वागत करून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे दर्शन दर्शन घेतले. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी, खामगाव जिल्हा व्हावा व व येणाऱ्या विधानसभेत शेतकऱ्यांचे सरकार यावे असे साकडे पांडुरंगाला घातले आहे. खामगाव -जालना रेल्वे मार्ग वर्षापासून प्रलंबित आहे. राज्य शासनाचा हिस्सा हा बजेटमध्ये मांडला नाही. जिल्ह्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे लवकरात लवकर पुढाकार घेतील, अशी अपेक्षा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी व्यक्त केली आहे..






