आशीष शेलार यांचे महायुतीवर भाष्य (फोटो- सोशल मिडिया)
आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका
राज्यात वाजले निवडणुकीचे बिगुल
रायगडमधील युतीवर केले महत्वाचे भाष्य
Ashish Shelar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान महायुती एकत्रित लढणार की स्वबळावर याची चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर मंत्री आशीष शेलार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आशीष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी नव्हे, तर मत गोळा करण्यासाठी बांधावर गेले आहेत. स्वतः काही काम न करता शासकीय यंत्रणा चालू असताना राजकीय दौरे करून मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ” महायुती बाबत बोलताना आशीष शेलार म्हणाले, “केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर राज्यभर महायुतीसोबत लढण्याचा निर्णय आहे. विरोधी पक्षाला फायदा होऊ नये, म्हणून काही ठिकाणी वेगळं लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील.”
पुढे बोलताना मंत्री आशीष शेलार म्हणाले, “पार्थ पवार यांच्या प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ अधिकार्यांची समिती नेमली आहे.सत्य नक्कीच समोर येईल. रायगडमध्ये भाजप स्वतंत्र लढणार किंवा महायुतीपासून वेगळं जाणार, अशी कोणतीही चर्चा नाही. महायुतीत एकत्र लढण्याचा सर्वसाधारण निर्णय आहे.”
निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल
दुबार मतदारांची यादी जाहीर केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा अभिनंदन केलं होतं. त्यावर आशिष शेलार यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलंय. मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुका महायुतीने जिंकल्यानंतर उद्धव ठाकरे यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची तंतरली आहे.
आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडीतील पक्ष हे उताणे पडले आहेत. यांना फक्त हिंदू मध्येच दुबार मतदान दिसतात मुस्लिम दुबार मतदारावर हे बोलायला तयार नसल्याचे यावेळी शेलार म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिण तर राज ठाकरेंची भूमिका ही मराठी द्वेषाची आहे. लातूरमध्ये 20 हजाराच्या वर मुस्लिम दुबार मतदार आणि विजय काँग्रेसचा त्यामुळे हा विजय प्रश्नांकित करायचा का आम्ही याचे काँग्रेसने यावर उत्तर द्यावं असेही ते म्हणाले.
Ashish Shelar : निवडणुका जिंकल्यानंतर Uddhav Thackeray यांना माझं अनेकदा अभिनंदन करावे लागेल
महाराष्ट्राचा पप्पू कोण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले जसं तारक मेहता का उल्टा चश्मा, महाराष्ट्र वाका विकास आघाडी का उलटा चष्मा त्यामध्ये पप्पू के पप्पा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील असा टोमणाही शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दुबार मतदार हा विशेष राम नाईक अध्यक्ष असल्यापासून आम्ही विषय घेतलेला आहे. मात्र आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काहीच उरलं नाही, त्यामुळे ते आमचाच विषय चोरतात. आगामी निवडणुकीच्या पराभवाच्या भीतीने पळपूटेपणा आणि भित्रेपना राज, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस महाविकास आघाडी पक्ष करत असल्याचे दिसून येत असल्याची टीकाही यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी केली.






