Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण जगाला बहिणाबाई समजल्या मात्र, लोकप्रतिनिधींना कशा कळल्या नाही?, ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना

२००८ मध्ये आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला मंजूरी मिळाली होती. या स्मारकाचं काही बांधकामही झालं आहे. परंतु, तब्बल १२ वर्ष उलटले हे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 24, 2023 | 11:54 AM
संपूर्ण जगाला बहिणाबाई समजल्या मात्र, लोकप्रतिनिधींना कशा कळल्या नाही?, ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : संपूर्ण जगाला तत्वज्ञान पटवून देणाऱ्या खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी (Bahinabai Chaudhary) यांचे माहेर हे जळगाव (jalgoan)आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा गावामधील बहिणाबाईंच्या स्मृती जिवंत राहाव्यात, त्यांचा इतिहास आचार विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचावा, म्हणून २००८ मध्ये आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला मंजूरी मिळाली होती. या स्मारकाचं काही बांधकामही झालं आहे. परंतु, तब्बल १२ वर्ष उलटले हे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. अनेक सरकार आली अन् जिल्ह्यात मंत्री झाले. मात्र, केवळ आश्वासनांचा पाऊस पडत आहे. मात्र, प्रत्यक्षात स्मारक पूर्ण झाले नाही.

या स्मारकाच्या जागेवर प्रचंड गवत वाढत आहे. स्मारक आणि त्या आजूबाजूचा परिसर हा अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आसोदा हे बहिणाबाईचे माहेर गाव याच गावात बहिणाबाई चौधरी यांचा जन्म झाला, याच गावात त्यांचे बालपण गेलं, आणि लग्न झाल्यानंतर त्या सासरी गेल्या. कालांतराने कवितांच्या माध्यमातून बहिणाबाई चौधरी या संपूर्ण जगापर्यत पोहचल्या. बहिणाबाईंच्या कविता या आजही मनाला भिडतात. केवळ कविता नाही, ज्या कविता बहिणाबाईंनी गायल्या, त्या कवितांमधून त्यांनी समाज परिस्थितीचे आयुष्यांच, जगण्याचं वास्तव मांडलं. जगभरात प्रसिध्द अशा बहिणाबाई चौधरी यांचा इतिहास कायम जपला जावा, म्हणून त्याचे माहेर म्हणजेच असोदा गावात बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक व्हावं, अशी गावकऱ्यांनी मागणी केली.

२००८ मध्ये या ठिकाणी स्मारकाला मंजुरी मिळाली, सभागृहासह कुंपन आणि भिंती असं बांधकाम झालं आहे. मात्र, कालांतराने हे काम रखडल. दहा वर्षापासून या स्मारकासाठी आसोदा येथील ग्रामस्थांचा लढा सुरु आहे. अनेक सरकारे बदलली, जिल्ह्याला मंत्रीपदेही मिळाली, मात्र मंत्र्यांकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात स्मारक मात्र पूर्ण झाले नाही. एक दोन नाही तब्बल १२ वर्ष उलटले मात्र, बहिणाबाई यांचे माहेर असलेल्या गावात त्यांचे स्मारक अजूनही होऊ शकलेले आहे, ही मोठी शोकांतिका आहे. संपूर्ण जगाला बहिणाबाई समजल्या. मात्र, लोकप्रतिनिधींना कशा कळल्या नाही? याची मोठी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाच्या कारभारावर तसेच लोकप्रतिनिधींवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आता सहनशक्ती आणि संयम संपला आहे, पुढच्या बहिणाबाईंच्या जयंतीपर्यंत जर स्मारकाचे काम पूर्ण झाले नाही, तर सर्व आसोदा गाव रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Bahinabai chaudhary jalgoan maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2023 | 11:54 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • jalgoan
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Shinde government

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.