Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतीच्या वादातून मारहाण, अखेर त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

कल्याण तालुक्यातील रुंदी आंबिवली हे गाव आहे. या गावात चांगदेव बनकरे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांची दोन मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 27, 2024 | 10:46 AM
शेतीच्या वादातून मारहाण, अखेर त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : शेतीच्या वादातून एका गटाकडून दुसऱ्या शेतकरी कुटुंबांला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेला वयोवृद्ध शेतकरी २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. चांगदेव बनकरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चांगदेव यांची पत्नी देखील गंभीर अवस्थेत आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. अन्य सहा जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक करावी अशी मागणी मयत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केली आहे.

कल्याण तालुक्यातील रुंदी आंबिवली हे गाव आहे. या गावात चांगदेव बनकरे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांची दोन मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात. यावर त्याचा उदर निर्वाह सुरु होता. ५ एप्रिल रोजी चांगदेव यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टोके यांनी सांगितले की, आमच्या शेतीत तू काय करते तू इथून निघून जा. उषाबाई हिने घडला प्रकार तिच्या मुलांसह पतिला सांगितला. चांगदेव आणि त्यांचे कुटुंबिय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले. बाळाराम याने सांगितले की, ही शेती आमची आहे. त्यावर तू मालकी हक्क कसा काय दाखवू शकतो. यावरुन चांगदेव आणि बाळाराम यांचा वाद झाला. या वादात बाळाराम टोके त्यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बनकरे कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाण चांगदेव बनकरे त्यांची पत्नी उषाबाई आणि दोन मुले तसेच चुलता हे जखमी झाले. चांगदेव यांना गंभीर अवस्थेत टिटवाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी आधी दोन जणांना अटक केली होती.

मात्र चांगदेव बनकरे यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. चांगदेवच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुुटुंबियांनी आधी त्यांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. या प्रकरणात नऊ आरोपी होते. सर्व आरोपींना पोलीस जोपर्यंत अटक करीत नाही. तोपर्यंत चांगदेव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलिसांनी समजूत काढली. या प्रकरणात सागर टोके, अमित टोके आणि प्रल्हाद टोके यांना अटक केली आहे. अन्य सहा आरोपींना अटकेचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर चांगदेव कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Beaten by a farm dispute the elderly farmers fight to death finally ended maharashtra government maharashtra politics kalyan thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 10:46 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
1

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण
2

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ
3

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर
4

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.