
बैठकीत अभियानाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षाच्या स्मरणार्थ समर्पित असून, त्यानिमित्त जिल्हाभर सामुहिक बंदे मातरम् गायन, प्रभात फेऱ्या, बाईक रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध स्तरांवर प्रभाच्ची जनजागूती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान, त्याचा योग्य चापर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची प्रभावी आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने काम करावे, असे निर्देश दिले, तसेच अभियानाच्या कालावधीत भारताच्या ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखावा, असे आवाहन करण्यात आले.
Buldhana News: ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ, प्रवाशांना मिळणार आधुनिक व सुरक्षित प्रवास