
डॉ. गणेश खवसे
समृद्धीवर अपघात; सिंदखेडराजा जवळ बस-ट्रकमध्ये धडक, ४ जण जखमी १ गंभीर
कृषी विभागाने यंदा १ कोटी ४४ लाख ३६८ हजार ५४ हेक्टर क्षेत्र हे पेरणीसाठ अपेक्षित धरले होते. त्यापैकी १ कोटी १७लाख ६८ हजार ८७१ हेक्टर क्षेत्र अर्थात ८२ टक्के क्षेत्रातच २७ जुलैपर्यंत पेरण आटोपली. ऊसाचे अपेक्षित लागवड क्षेत्र सर्वाधिक पुणे विभागात असून तेथे लाख ६९ हजार २०३ हेक्टर क्षेत्रात लागवड अपेक्षित धरण्यात आली होती त्यापैकी ६५ हजार ४६ हेक्टर क्षेत्रातच लागवड झालेली असून ते केवळ १० टक्के आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरचे लागवड क्षेत्र कोल्हापूर विभागात (४,५३,१३६ हेक्टर) असून तेथे १० टक्के लागवड झाली. नाशिक विभागात २८ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात १६ टक्के, लातूरमध्ये ८, नागपूरमध्ये केवळ ३ टक्के लागवड झाली. अपेक्षेच्या तुलनेत अमरावती विभागाने बाजी मारली असून तेथे अपेक्षेपेक्षा ४९ टक्के क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली.
जुलै अखेरपर्यंत विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभा तुलनेने पेरणी बऱ्यापैकी झालेली आहे. यामध्ये अमरान विभागाने बाजी मारली, विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह अपेक्षेपेक्षा ९ टक्के अधिक अर्थात १०९ टक्के पेन आतापर्यंत झालेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर वर्धा जि असून तेथे ९० टक्के पेरणी झाली. अकोला ७४, वाशिम अमरावती ८१, यवतमाळ ८४, नागपूर ५७, भंडारा गोंदिया ५६, चंद्रपूर ७२ तर गडचिरोली जिल्ह्यात ६९ ट पेरणी आटोपलेली आहे.