Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना दुकानांमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसल्यानंतर घटनेची माहिती पोलिस व स्थानिक नागरिकांना देण्यात आली. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. तोपर्यंत आगीने चारही दुकानांना बेहा घातल्ला होता.या आगीत आकाश भालेराव यांचे ऑटोमोबाईल व दुचाकी दुरुस्तीचे दुकान, गजानन गाभणे यांचा आरओ अॅक्वा फिल्टर पाण्याचा प्लांट, ओंकार भांदुर्गे यांचे चहा-नाश्त्याचे हॉटेल तसेच मदन इंगोले यांचे कृषी सिंचन साहित्याचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले, आकाश यांच्या गरजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांच्या अनेक दुचाक्याही आगीत जळून गेल्या. वाहनांचे केवळ लोखंडीसांगाडे शिल्लक राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले, गॅरेजमधील यंत्रसामग्री, स्पेअर पार्ट्स, तेलाचे डबे व इतर साहित्य पूर्णतः नष्ट झाले.
गाधणे यांच्या आरओ प्लांटमधील पाण्याच्या टाक्या, कॅन, मोटारी, फिल्टर यंत्रणा, विद्युत वायरिंग आणि इतर उपकरणे जळून मोठे नुकसान झाले. ओकार भांदुर्गे यांच्या चहा-नाश्त्याच्या दुकानातील फर्निचर, खाद्यसाहित्य, गॅस शेगड्या, भांडी आणि इतर साहित्य राख झाले. मदन इंगोले यांच्या कृषी सिंचन साहित्याच्या दुकानातील पीव्हीसी पाइप, ठिबक सिंचन साहित्य, कृषी उपकरणे व विक्रीसाठी ठेवलेला संपूर्ण माल आगीत भस्मसात झाला.
प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्या करण्यात येत आहे. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित विभागाकडून तपास सुरू आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली,
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार थोगिता भारद्वाज, पोलिस उपनिरीक्षक धनराज तायडे यांच्यासह प्रवीण गावंडे, शंकर खोडवे, नागेश देवकर, संदीप उघाडे व इतर पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी – दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाशिम, मालेगाव आणि रिसोड येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. ३ अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आगीची तीव्रता इतकी होती की चारही दुकाने पूर्णपणे जळून गेल्यानंतरच उसग नियंत्रणात आली.
या आगीत चारही व्यावसायिकांनी अनेक वर्षाच्या मेहनतीने उभा कैलेला व्यवसाय काही तासात राख झाल्याने व्यापारी हतबल इझाले. स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संस्थांकडून मदतीचा हात पुढे करण्यात येत असला, तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ती अपुरी आहे.






