
crime (फोटो सौजन्य: social media)
भिसी येथील जुनी वस्तीमध्ये राहणाऱ्या मच्छिन्द्र यांना दारूचे व्यसन होते. त्यांना दोन मुले आहेत. ते नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व मारहाण करीत होते. रविवारी गावात साक्षगंधाचा कार्यक्रम होता. संदेश मेश्राम हा जेवण वाढण्यासाठी गेला होता. जेवण आटपल्यावर संदेश घरी परतला. त्यावेळी वडील घरी आले नव्हते. रात्री ११ वाजता वडील दारूच्या नशेत घरी आले. त्यावेळी संदेशने जेवण आणले आहे करून घ्या, असे म्हटले. मात्र मला अजून दारू प्यायची आहे, मी पुन्हा घेऊन येतो असे म्हटल्यावर मुलाने आता जाऊन नका, असा आग्रह केला. मात्र वडील ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे वडिलांनी मुलाला शिवीगाळी करणे सुरू केले, त्यावेळी संदेशचा राग अनावर झाल्याने घरातील नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळत त्यांना ठार केले.
घटनेची माहिती मिळताच भिसी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले, संदेशला ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र त्याने असे काही केले नाही, वडिलाने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे सांगितले. सपोनि भोंगाडे यांनी आरोपीला पोलिस खाक्या दाखविताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी संदेशवर पोलिसांनी कलम १०३ (१) अनव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली.
४ दिवसातील तिसरी घटना: शुक्रवारी
मूल तालुक्यातील डोंगरगावात कारल्याची भाजी का केली म्हणून दारूड्या मुलाने आईला बेदम मारहाण करीत तिचा खून केल्याची घटना उघडीस आली. त्याच दिवशी वरोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जेवणाला उशीर का झाला म्हणून दारूड्या मुलाने आई, वडिलांना बेदम मारहाण केली. या घटना ताज्या असताना भिसी येथे मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात दारूमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. गाव तिथे अवैद्य दारूचे प्रमाण वाढलेले असतांना पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरीकांतून संताप व्यक्त केल्या जात आहे.
भावाला फोन करून दिली खुनाची माहिती
घटनेच्या दिवशी संदेश व वडील हे दोघेच घरी होते. वडिलांना ठार मारल्याची बाब स्वतः आरोपीने सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या मोठ्या भावाला फोन करून सांगितली. वडिलांचा खून झाला अशी माहिती मिळाल्यावर पंचशील मेश्राम भिसीमध्ये दाखल झाला, तर त्याने वडील नेहमी दारू पिऊन मला व आईला शिवीगाळ करीत होते म्हणून मी रागाच्या भरात वडिलांचा गळा आवळला, असे संदेशने भावाला सांगितले. पंचशीलने तत्काळ भिसी पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली.
Ans: दारूच्या नशेतून होणाऱ्या शिवीगाळ व मारहाणीच्या वादातून.
Ans: हत्या कशी करण्यात आली?
Ans: सुरुवातीला आत्महत्येचा दावा; नंतर गुन्ह्याची कबुली.