
Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
जिल्ह्यातील असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभासराड, लालनाला, अंमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव आणि इराई या प्रमुख प्रकल्पांवर सिंचन, पिण्याचे पाणी तसेच विविध गरजा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. या प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण होणे हे जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, यंदा पावसाने सातत्य न राखल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात जिल्हाभरात दीर्घकाळ पावसाने दडी मारली. परिणामी जलप्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नाही. पावसाच्या या लहरीपणाचा थेट परिणाम शेती आणि भूजलपातळीवरही होण्याची शक्यता आहे.
जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमी राहिल्यास केवळ शेतीच नव्हे, तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निमर्माण होऊ शकतो. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेल हे पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा न झाल्यास परिणाम भूजलपातळीवरही त्याचा होण्याची शक्यता आहे. जलसाठ्याची ही स्थिती पाहता प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजन, उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर व्यवस्थापन आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून आहेत. कापूस, सोयाबीन, धान, तूर यासह विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसातील खंडामुळे पिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात पावसाने साथ दिली नाही, तर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह