Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: 200 मृत्यूंनंतरही ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना कागदावरच; चंद्रपुरकरांचा संताप वाढला

चंद्रपुरातील ग्रामस्थ अजूनही 'बिबट समस्यामुक्त ग्राम' योजनेची अंमलबजावणी कधी होणार याची प्रतिक्षा करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 200 जणांचा मृत्यू झालाचा अहवाल समोर आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 01:54 PM
Chandrapur News: 200 मृत्यूंनंतरही ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना कागदावरच; चंद्रपुरकरांचा संताप वाढला

Chandrapur News: 200 मृत्यूंनंतरही ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना कागदावरच; चंद्रपुरकरांचा संताप वाढला

Follow Us
Close
Follow Us:
  • बिबट्यांच्या हल्ल्यांनी 5 वर्षांत घेतले 200 जीव; तरीही चंद्रपुरात योजना सुरूच नाही
  • ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ला मंजुरी मिळाली, पण अंमलबजावणी अद्याप शून्य!
  • चंद्रपुरात बिबट्यांचा धोका वाढतोय; कायमस्वरूपी उपाययोजना अजूनही थांबलेली
चंद्रपूर: मानव-बिबट्या संघर्षांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तयार करण्यात आलेली ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. गत पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांत सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद असताना, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आधारित ही योजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

Unseasonal Rain: कराड तालुक्याला अवकाळीचा तडाखा! गहू, ज्वारी अन् भाजीपाला पिकाला फटका

२०१३ मध्ये सलग आठ जणांचा मृत्यू आणि २०१८ मध्ये अर्जुनी परिसरात पाच जणांचा बळी गेल्यानंतर इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी या योजनेची संकल्पना मांडली. गावपातळीवर स्वच्छता, झाडी नियंत्रण, प्रकाश व्यवस्था आणि लोकसहभागाच्या माध्यमातून बिबट्यांचा गावातील वावर कमी करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्याचा सुमारे ४२ टक्के भाग वनक्षेत्र असल्याने जंगलालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे व लहान पाळीव प्राण्यांमुळे बिबट गावाकडे आकर्षित होत असल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे गावाभोवती झुडपे हटवणे, स्ट्रीटलाइट्स बसवणे, सौर कुंपण उभारणे आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

८ मे २०२४ रोजी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत या योजनेला तत्त्वतः मान्यता मिळाली होती. मात्र निधीअभावी आणि अंतिम प्रशासकीय मंजूरी न मिळाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही. दरम्यान, धोतरे यांनी योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली असून, ‘घटना घडल्यानंतर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय अधिक प्रभावी ठरतात,’ असे मत व्यक्त केले आहे.

प्रमुख उपाययोजना

  • गावाभोवती झाडी व झुडपे हटवणे.
  • रस्ते व प्रवेशद्वारांवर स्ट्रीटलाइट्स बसविणे.
  • भटक्या कुत्र्यांचे निबींजिकरण करणे.
  • मृत जनावरांची योग्य विल्हेवाट करणे.
  • सौरऊर्जेवर चालणारे कुंपण तयार करणे.
  • जैविक कुंपण व तण नियंत्रण ठेवणे.

ग्रामंस्थामध्ये असंतोष

तयार आराखडा असूनही योजना प्रत्यक्षात न आल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Mumbai News: परदेशी पर्यटकांच्या व्हिडीओचा इम्पॅक्ट! वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणांवर रेल्वेचा हातोडा

अंमलबजावणी का रखडली?

  • निधीची उपलब्धता अद्याप स्पष्ट नाही.
  • अतिम प्रशासकीय मंजुरी प्रलंबित.
  • विविध विभागांतील समन्वयाचा अभाव.
  • निर्णय प्रक्रियेला लागणारा विलंब.
  • स्थानिक पातळीवर कार्यवाहीचा अभाव.
  • योजना प्रत्यक्षात आली नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Leopard free village scheme still pending in chandrapur despite 200 deaths in five years chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Leopard
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
1

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु
2

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण
3

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
4

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.