आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, विविध समाजसेवी संस्थांचे पथके आदी उपस्थित होते.वेरुळ गावातील वेरुळ लेणी ते अरिहंत चौक, कैलास हॉटेल ते येळगंगा नदी,येळगंगा नदी ते तलाठी ऑफिस, मालोजीराजे भोसले गढी, तीर्थकुंड ते भोसले चौक, भोसले चौक ते कसाबखेडा रोड आदी परिसरात बाजार तळ, कब्रस्थान, एमटीडीसी पाकींग, महादेव उद्यान, दर्गा दावल मलिक, भीमनगर परिसर अशा भागात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक गावकरी आदींनी आपले श्रमदान करुन स्वच्छता केली.
स्वच्छता भाविकांना व मूलभूत सुविधा देणे हे कर्तव्य
कचरा संकलनासाठी आणलेल्या वाहनांचे पूजन करुन स्वच्छता मोहिमेस प्रारंभकरण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत दैनंदिन स्वच्छता राबविण्यात येते. गावातील लोकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. आ. प्रशांत बंब म्हणाले की, महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथे देशभरातील भाविक येतात. त्यांना या ठिकाणी स्वच्छता व सुविधा उपलब्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता ही निरंतर बाब असून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.
स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे.. आपल्या जिल्ह्यात असलेले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छता व सेवा मिळायला हवी, येथे जर अस्वच्छता असली तर ती बाब आपल्याला भुषणावह नाही. आपण सर्व विभाग व स्वयंसेवी संस्था मिळून 2 हजार लोकांचे श्रमदान करुन मंदिर व वेरुळ परिसर स्वच्छ करू या. असे आवाहन त्यांनी केले.मोहिमेत सहभागी सगळ्यानी नेमून दिलेला परिसर स्वच्छ केला. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल विभाग, परिवहन विभाग, वन विभाग, पुरातत्व विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.






