
मनपाचा 'अॅक्शन प्लॅन' रेडी! नगरसेवक अन् अधिकारी प्रभागात काढणार प्रभातफेरी (Photo Credit - X)
प्रत्येक प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्तांनी ‘संयुक्त प्रभातफेरी’चा निर्णय घेतला आहे. प्रभागातील चार नगरसेवक, संबंधित वॉर्ड अधिकारी आणि उपअभियंता यांना एकत्र प्रभातफेरी काढावी लागणार आहे. या फेरीदरम्यान लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष वॉर्डात जीऊन नागरिकांच्या अडीअडचणी आणि नागरी समस्या जाणून घेतील. प्रभातफेरीनंतर नगरसेवकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून वॉर्डातील सर्वात महत्त्वाच्या १० समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे.
एकाच वेळी शेकडो कामांच्या मागण्या आल्यामुळे कोणत्या कामाला आधी निधी द्यावा, असा प्रश्न मनपाच्या बांधकाम आणि ड्रेनेज विभागाला पडला होता. आता नगरसेवकांनीच १० महत्त्वाची कामे निवडून दिल्यास, प्रशासनाला त्या कामांच्या निविदा प्रक्रिया आणि अमलबजावणी करणे सोपे होणार आहे. ज्या समस्यांमुळे नागरिकांना सर्वाधिक त्रास होतोय, अशाच १० कामांना पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक १० फेब्रुवारीला होणार असून ४ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जाच्या वितरणाला सुरुवात होत आहे. ६ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. तर १० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू होईल.
प्रभागात मातब्बर असलेला नगरसेवकच सर्वाधिक निधी खेचून आणून विकास करू शकतो. तर नवीन नगरसेवकांना निधी मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी मनपाने प्रत्येक नगरसेवकाच्या वाँडांत ५० कोटीची कामे करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना विकास करण्यासाठी निधी मिळेल.
आता होणार ‘स्मार्ट पार्किंग’! मोबाईल अॅपवरून होणार जागा बुक; पाहा किती असेल दर आणि कशी मिळेल सुविधा?