
जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार (Photo Credit- X)
जनगणना ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया असून त्यात कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. आदेश मिळालेल्या सर्व शिक्षकांनी कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. जनगणनेसाठी नियुक्ती आदेश मिळूनही ड्युटीवर अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत असलेले आणि जनगणनेच्या आदेशानंतरही कामावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. शिक्षण विभागालाही याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मनपा आस्थापनेवरील जे कर्मचारी अद्याप स्वगणना प्रक्रियेत सहभागी झाले नाहीत, त्यांची माहिती संकलित करून त्यांच्या पगारातून कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून यावर स्वतंत्र लक्ष ठेवले जाणार आहे.
ज्या शिक्षकांना जनगणनेचे आदेश प्राप्त झाले आहेत त्यांनी विलंब न करता कर्तव्यावर रुजू व्हावे व संबंधित अहवाल वेळेत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई अटळ असल्याचा इशारा प्रशासनाने सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे. दिला आहे. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.