
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४३ अंशांच्या पार (Photo Credit- X)
एप्रिल महिन्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात फिरत आहे. दोन दिवसांपूर्वी तर विक्रमी ४३ अंशाच्याही पुढे तापमानाची नोंद झाल्याने पुढील उन्हाळ्याचा अंदाज भयंकर अंदाज व्यक्त होतो आहे. मागील तीन वर्षात एप्रिल महिन्यात असलेल्या कमाल तापमानाच्या तुलनेत यावर्षी रविवारी सर्वाधिक ४३. ४ अंश सेल्शियसपर्यंत पोहोचले होते. सोमवारी ४३ अंशावर पारा होता. तर मंगळवारी ४२. ८ अंशावर किमान तापमान नोंदवले गेले आहे.
सूर्य आग ओकत असल्याचे चित्र शहरात तहान नाही तरीही पाणी प्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशावेळी शरीरातील पाणीपातळी झपाट्याने खाली जाते. त्यातच घराबाहेत उन्हात फिरत असाल तर पाण्याचे प्रमाण वेगाने कमी होते. यासाठी तहान लागली नाही तरीही ठराविक अंतराने पाणी पीत रहावे. शरीराची पाणीपातळी संतुलित ठेवावी. काकडी, टरबूजसारखी पाणीदार फळांचे सेवन अधिक करावे. आरोग्याची तक्रार जाणवल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवावे.
सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. या उन्हाचा आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. विशेष करून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशक्तपणा, थकवा आणि अतिसारसारख्या आरोग्याचं तक्रारी दिसू लागल्या आहेत. परिणमयी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या गर्दी होऊ लागली आहे. शहरातील शासकीय रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये तसेच गल्ली बोलतील क्लिनिकमधेही रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या
ओपीडीमध्ये दररोज चार ते पाच रुग्ण येत आहेत. मागील चार दिवसात यात वाढ झाली आहे. मात्र रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याइतके गंभीर रुग्ण नसल्याने काहीसा दिलासादायक चित्र आहे. तरीही वाढत्या उन्हापासून बचावासाठी स्वतः काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे. मंगळवारी कमाल ४२. ८ तर किमान तापमान २८. ५ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.
| दिनांक | कमाल तापमान | किमान तापमान |
| २६ एप्रिल | ४३.४°C | २७.६°C |
| २७ एप्रिल | ४३.०°C | २८.७°C |
| २८ एप्रिल | ४२.८°C | २८.५°C |
शहरी भागात सिमेंटच्या इमारती आणि रस्त्यांमुळे उष्णता अधिक निर्माण होते. यामुळे शहरी भागातील रुग्णालये आणि क्लिनिक्स रुग्णांनी भरलेले असताना ग्रामीण भागातदेखील सारखीच परिस्थिती आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत चालवले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामस्थ आरोग्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. जिल्हाभरात दररोज ३०० ते ४०० च्या आसपास रुग्ण उन्हाच्या तक्रारी घेऊन येत असल्याचा अंदाज आहे.