
मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली (Photo Credit- X)
मराठवाड्यातल्या या मोठ्या धरणांचा प्रकल्पिय संकल्पित साठा ५१५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. यामध्ये सध्या ३७३० दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणाचा २१७१ दशलक्ष घनमीटर एवढी प्रकल्पिय साठा आहे, त्यापैकी सध्या १५७१ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजे ७२ टक्के पाणीसाठा आहे.
सध्या सर्वात कमी उपयुक्त साठा हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात आहे. याचा प्रकल्पियसाठा ८१ दशलक्ष घनमीटर आहे तर सध्या ३२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरीचा प्रकल्पिय साठा ८०९ दशलक्ष घनमीटर असून सध्या ६३९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. हा साठा ७९ टक्के आहे. जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात १३६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५६ टक्के आहे.
जिल्ह्यातील सिना कोळेगाव प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ८९ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ६० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६८ टक्के एवढे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ९६४ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ७२२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७५ टक्के एवढे आहे. नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा १३८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या त्यात ८० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५८ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील विष्णूपुरी प्रकल्पात ४७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाद प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ३१२ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात २२९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७३ टक्के एवढे आहे. याच जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा १७७ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात १३९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ७९ टक्के एवढे आहे. धाराशीव जिल्ह्यातील निम्न तेरणा प्रकल्पाचा प्रकल्पिय साठा ९१ दशलक्ष घनमीटर असून सध्या त्यात ७४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हे प्रमाण ८१ टक्के एवढे आहे.