
वेगवान समृद्धी महामार्ग ठरतोय 'मृत्युमार्ग'! (Photo Credit- AI)
महामार्गावरील अपघातांचे प्रमुख कारण वाहनांचा अनियंत्रित वेग असल्याचे समोर आले आहे. सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सर्वेक्षणानुसार सुमारे ७५ टक्के अपघातांचे मूळ कारण ओव्हरस्पीडिंग आहे. सरळ आणि रुंद रस्त्यामुळे वाहनांचा वेग सहज वाढतो; मात्र त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने अपघात वाढत आहेत, विशेषतः सावंगी इंटरचेंज ते हडस पिंपळगाव हा पट्टा अपघातांच्या दृष्टीने धोकादायक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महामार्गावरील अपघातांवर नियंत्रणासाठी आयटीएमएस (इंटेलिजेंट ट्रैफिक मॅनेजमेंट सिस्टीम) कार्यान्वित करण्यात येणार आहे. २७ ते २९ डिसेंबरदरम्यान या प्रणालीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या अंतर्गत सीसीटीव्ही आणि एएनपीआर कॅमेरे बसवून वाहनांचे क्रमांक ओळखले जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चालान पाठवले जाणार आहे, या प्रणालीत १७ प्रकारच्या वाहतूक गुन्ह्यांची नोंद होणार आहे. नियंत्रण केंद्र ठाणे जिल्ह्यातील आमने येथे असणार आहे.
२०२३३९० अपघात. १४ प्राणातिक अपघातांत ३२ मृत्यू. ५६ गंभीर अपघातांत १३१ जखमी, १५९ किरकोळ अपघातांत २७२ जखमी. १६१ अपघातांत जीवितहानी नाही.
२०२४ ४१६ अपघात. ३५ प्राणांतिक अपघातांत ४९ मृत्यू. ३३ गंभीर अपघातांत ११४ जखमी, १२८ किरकोळ अपघातांत २३८ जखमी. २२० अपघातात कुणीही जखमी नाही.
२०२५ ४९६ अपघात. २२ प्राणांतिक अपघातांत २८ मृत्यू. ४७ गंभीर अपघातांत १०० जखमी, १४८ किरकोळ अपघातांत २८७ जखमी. २७९ अपघातांत जीवितहानी नाही.
२०२६ (फेब्रुवारीपर्यंत) ६६ अपघात. ३ मृत्यु, ५ गंभीर अपघातांत ८ जखमी, २४ किरकोळ अपघातांत ५२ जखमी. ३४ अपघातांत कुणीही जखमी नाही.
८८ समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित होत आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर कॅमेरे बसवले जाणार असून वाहनांच्या वेगासह विविध बाबींची तपासणी केली जाईल, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.”
– किशोर चौधरी, पोलिस निरीक्षक, महामार्ग,
छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट! उद्योजकांची तातडीची बैठक; राज्य सरकारकडे करणार मागणी