
नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध 'अंगलट'!
संभाजीनगर शहरातील शहागंज परिसरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान एमआयएम नगरसेवक व त्यांच्या कार्यकत्यांनी हस्तक्षेप करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत हाकलून लावल्याचे बोलेल जात आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ठिणग्या उड्डू लागल्या आहेत.
२७ फेब्रुवारी रोजी १५ ते २० एमआयएम नगरसेवक व त्यांच्या ३० ते ४० कार्यकत्यांनी शहागंज परिसरात गर्दी करत अतिक्रमण हटाव कारवाईस विरोध केला. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह इतर नगरसेवकांनी शिवीगाळ करत महापालिकेला शहागंज परिसरात दादागिरी करू देणार नाही अशा धमकीवजा घोषणा दिल्याचा आरोप फियर्यादीत आहे. हातगाडीधारकांना पुन्हा रस्त्यावर व्यवसाय सुरू करण्यास विधावणी देण्यात आल्याचे देखील नमूद आहे.
दरम्यान, आता या नगरसेवक व कार्यकत्यांचे पद काढून घेण्याबाचत कार्यवाही सुरु झाली आहे. विभागीय आयुक्तांकडे ही कारवाई होईल. इतक्या मोठ्या प्रमाणात असे झाल्यास राज्यातील ही पहिलीच घटना ठरणार आहे. यामुळे महापालिकेतील विरोधकांची धार कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यानंतर आता शहरातील राजकारण चांगलेच तापले असून एमआयएम आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. भाजपचे आ. केणेकर यांनी या घटनेचा समाचार घेतला, ते म्हणाले, हे कायदा आणि सुशासनाचे राज्य आहे, संभाजीनगरमध्ये त्यांना कितीही मोठे यश मिळाले असले तरी हे कायद्याचे राज्य आहे हे त्यांनी विसरू नये, जो कायदा मोडेल त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी भूमिका केणेकर यांनी व्यक्त केली. तर आम्ही कोणतीही गुंडगिरी केलेली नाही, केवळ जाणीवपूर्वत आमच्यावर कारवाई केली असल्याचे एमआयमएम नगरसेवकांचे म्हणणे आहे. शहरात हप्तेवसुली करणे, दबाव निर्माण करणे, शहरात अराजकता निर्माण करण्याचे काम काहींच्या बाबतीत दिसून आल्याने ही कारवाई झालेली असल्याचा गंभीर आरोपही आ. केणेकर यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढे काय होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
जर अपात्रतेची कारवाई प्रत्यक्षात आली, तर महापालिकेतील संख्याबळावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ प्रशासकीय न राहता राजकीय गणिते बदलणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहागंज अतिक्रमण हटाव
मोहिमेमुळे आता कायदा विरुद्ध राजकारण असा संघर्ष उभा झाला असून, एमआयएम नगरसेवकांवरील अपात्रतेचा प्रस्ताव पुढील काही दिवसांत शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणार असल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवकानी उमेदवारी अर्जात अतिक्रमण हटविण्यास विरोध न करण्याचे शपबपत्र दिलेले असतानाही जाणीवपूर्वक सरकारी कामात अडथळा आणला, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीचा भंग करून लोकसेवकांना चमकावल्याप्रकरणी महापालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेता अब्दुल समीर साजिद, सय्यद उसामा काकासाहेब काकडे, अकिल अहेमद, फेरोज खान, मेराज खान, मो, वाजेद जाहगिरदार, सोहेल कुरैशी, मो, वसीम अलीम अहेमद मतीन पटेल यांच्यासह ३० ते ४० जणांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.