पैठण- बाळासाहेबाची खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचे उत्तर आजच्या सभेतील गर्दीने दिले आहे. कुणी जबरदस्ती पैसे देऊन येथे आले नाही. प्रेमाने येथे सभेसाठी हे लोक येथे आले आहेत असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन ठाकरे गटावर केला. ते पैठणमध्ये सभेत संबोधन करीत आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो.
मुख्यमंत्री म्हणाले, पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पैठण येथे सभास्थळी आगमन झाले. त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. त्यानंतर ते सभेला संबोधन करीत आहेत.