पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणात ज्याचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं ते वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आले आहेत. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सीआयडीचे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्या शरणागतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी एफआयआर नंबर ६३८/२०२४ मधील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाला. त्याला पुणे सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आलं आहे. आरोपी वाल्मिक कराडसोबत आमच्या टीमसह बीडचे तपास अधिकारीही आहेत. बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे त्याला रवाना करण्यात आलं आहे, पुढची तपासणी गुजर हेच करतील. सीआयडीचे डीवायएसपी आहेत त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात आलं आलं आहे, अशी माहिती सारंग आव्हाड यांनी दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप होत असलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आरोप केले जात असून जर पोलीस तपासात दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Walmik Karad : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
“काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं असतं. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाचा मला वाटत नाही की, फार काही फायदा पडेल. त्यामुळे मला कोणत्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थनही करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधकांनी राजकारण करत राहावं. आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.