भविष्यात MPSC ची मोठी भरती, परीक्षांसंदर्भातही CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
युपीएससीच्या धर्तीवर राज्यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदारसह इतर पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीप्रक्रिया राबविण्यात येते. मात्र, एमपीएससीची दिरंगाई आणि अधिकाऱ्यांमधील ताळमेळ, परीक्षांनंतर निकाल आणि नियुक्तीलाही एमपीएसीकडून तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप होत असतो. याबाबत राज्यातील आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे. भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असं आश्ववासन त्यांनी दिलं आहे.
नव्याने समाविष्ठ बत्तीस गावांसाठी पुणे महापालिकेने दिले काय? विधीमंडळात विचारण्यात आला प्रश्न
युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसाठी जाहीरात देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली.
सर्व राज्यांचा आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशात वर्ग ए दोन आणि तीन देखील आपण एमपीएससीला दिलेलं आहे. त्यातूनच, आपण एमपीएससीचं रिस्ट्रक्चरिंग करत आहोत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, अशात आपण त्यांच्यासोबत बोलणी करुन, त्यांचं ऐकून काही गोष्टी करत आहोत, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
आमदार विक्रम काळे यांनी, MPSC मध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकिया पूर्ण होऊनही उमेदवारांचे पोस्टिंग होत नाही. याशिवाय पोस्टिंग देण्यासाठी काही व्यवहार होतात, असा आरोप केला होता. त्यावरही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं.
‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’बाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश; आता…
एमपीएससीची सर्वच पदं लवकर भरली गेली पाहिजे हा प्रयत्न असतो. सध्या तीन पदे रिक्त आहेत, ती आपण तात्काळ भरतोय. पूर्ण रिस्ट्रकचर करत आहोत. भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया राबवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तसेच, परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केलं, तरी देखील मी मान्य करतो की अजून वेगाने काम करू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.