
युद्धामुळे खत निविष्ठाची गुंतागुंत! खरिपाचे नियोजन अंतिम टप्यात; खत, रासायनिक औषधांचे नियोजन कठीण
खरीप हंगामाला २ महिन्यानंतर सुरुवात होणार आहे. यासाठी शासनस्तरावरून मार्च, एप्रिल महिन्यामध्येच खरिपाचे नियोजन केले जाते. मात्र, यावर्षी बियाणांचे नियोजन अंतिम टप्प्यात असले तरी खत व इतर रासायनिक औषधांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. आखातील युद्धामुळे संभाव्य निविष्ठा लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे. मात्र युद्ध किती दिवस चालणार? यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वत्र इंधनाचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे. हीच परिस्थिती अंतर्गत बाबींचीही असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. तरीही प्रशासकीय स्तरावरून अनेक बाबींचे नियोजन केले जात आहे. कुठेकही कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. विशेष बाब म्हणजे पारंपरिक पद्धतीनेही खरिपाचे उत्पादन घेता येऊ शकते. विद्यमान परिस्थितीत अनेक कृषी तंत्रज्ञान विकसीत झाले असल्याने खत अथवा रासायनिक औषधांना पर्यायी व्यवस्था शोधता येऊ शकते. यादृष्टीनेही प्रशासकीय यंत्रणा काम करीत असल्याचे बोलल्या जात आहे. दर्जेदार उत्पादन येण्यासाठी खतांचा वापर केला जाते.
रासायनिक खतांचे दुष्परिणामावर गत काही वर्षांपासून जनजागृती केली जात आहे. सेंद्रिय शेतीवर भर दिला जात असल्यामुळे रासायनिक खताची समस्या उद्भवू नये, याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताची निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यावर्षी कृषी विभागाच्यावतीने खरिपाचे नियोजन पूर्ण केले असले तरी खताच्या निविष्ठेबाबत शाशंकता आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी आत्तापासून सेंद्रिय खत निर्मितीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.
जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प
दिवसेंदिवस शेतीचे आरोग्य धोक्यात येत आहे. दर्जेदार उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खताचा वापर केला जात आहे. यासोबतच रासायनिक औषधांचाही वापर होत आहे. यामुळे शेतीचे आरोग्य धोक्यात सापडले असून शेतीचे आरोग्य कायम टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती हा पर्याय असल्याचे कृषी तज्ञांकडून सांगितले जात आहे. सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय खताची निर्मिती हा एकमेव पर्याय असल्याचेही कृषी तज्ज्ञांचे मत आहे.