Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा’; राहुल गांधी महाराष्ट्रात येण्यापूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिला गंभीर इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्याचा मुद्दा आता भाजपने उपस्थित केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2023 | 03:49 PM
निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची दंगल घडवण्याची भाषा योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उद्देशून गंभीर इशारा दिला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या अपमानाची राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावे, असा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्याचा मुद्दा आता भाजपने उपस्थित केला आहे. बावनकुळे यांनी म्हटले की, ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाचवेळा अपमान केला. त्यांनी अजूनही त्यांची भूमिका बदलली नाही. अजूनही ते माफी मागण्यासाठी तयार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या सर्व वक्तव्यांबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. तेव्हाच त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवावे, असे सांगितले.

फौजदारी तक्रार दाखल

यापूर्वी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांची बदनामी झाली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आहे’, असे सात्यकी यांनी ट्विट करून म्हटले होते.

राहुल गांधींचं विधान काय?

ब्रिटिशांसमोर न झुकणारे बिरसा मुंडासारखे महान व्यक्तिमत्त्व आहे आणि दुसरीकडे इंग्रजांची माफी मागणारे सावरकर आहेत. सावरकर हे इंग्रजांची माफी मागणारे आहेत, असे राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान म्हटले होते.

Web Title: Congress leader rahul gandhi should apologize and then step in maharashtra says chandrashekhar bawankule nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2023 | 03:49 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Cm Eknath Shinde
  • devendra fadnavis
  • Dy CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • political news
  • Rahul Gandhi
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
4

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.